शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

विखरणीसह परिसरात अक्षय प्रकाश योजनेला मंजुरी

By admin | Updated: March 20, 2017 23:56 IST

शैलेश कुमार : महिन्याभरात लेखी निविदा काढण्याचे आश्वासन ; परिसरातील शेतकऱ्यांना होणार फायदा

येवला : तालुक्यातील विखरणी उपकेंद्रातून त्वरित संबंधित सर्व गावांना अक्षय प्रकाश योजना सुरू करण्यात येणार असून, एक महिन्याच्या आत निविदा काढण्याचे लेखी आश्वासन विद्युत वितरण कंपनी मनमाड विभागाचे उपविभागीय अभियंता शैलेश कुमार यांनी दिले.याबाबत ‘लोकमत’ने दि. ९ मार्चच्या अंकात ‘अक्षय प्रकाश योजनेची मागणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची वीज वितरण कंपनीकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली. अक्षय प्रकाश योजनेसाठी येवला-मनमाड महामार्गावरील विसापूर फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला होता. मात्र यासंदर्भात मनमाड उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत एक महिन्याचा आत निविदा काढण्याचे लेखी आश्वासन मनमाड विभागाचे उपविभागीय अभियंता शैलेश कुमार यांच्याकडून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. एक महिन्यात यावर कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेण्याची भूमिका मोहन शेलार, नामदेव पगार, अशोक कोताडे, अशोक बंदरे, बाळासाहेब उशीर यांचेसह शेतकऱ्यांनी स्पष्ट केली आहे. (वार्ताहर)