शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पावसाच्या उघडीपमुळे शेतीकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:50 IST

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये चांगला व उत्तम प्रकारचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे.

ठळक मुद्देखरीपाच्या लागवडीसाठी शेतकरी सज्ज; कोरोनामुळे विक्र ीची भीती कायम

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये चांगला व उत्तम प्रकारचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे.पाऊस वेळेवर पडल्याने खरीप हंगामातील पिकांची लागवड आणि पेरणी योग्य वेळेत होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदा जोरदार पाऊस होणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकºयांनी नगदी पिकांकडे कल वाढविलेला दिसत असला तरी कोरोनाच्या भीतीमुळे तयार झालेले पीक बाजारात विकता येईल की नाही किंवा बाजार समित्या वेळेवर चालू राहतील की नाही याची भीती शेतकºयांच्या मनामध्ये मात्र कायम आहे.अनेक वर्षांपासून जून महिन्यामध्ये फारसा पाऊस पडत नाही, जुलै महिन्यात सुरू होणारा पाऊस पुढे आॅक्टोबर-नोव्हेंबरला जोरदार पडत होता. त्यामुळे खरीप पिकांची लागवडदेखील जुलै-आॅगस्ट महिन्यात खºया अर्थाने सुरू होत असे, यंदा मात्र जून महिना सुरू होताच पावसाने दमदार हजेरी लावली आणि सगळ्याच भागांमध्ये मुबलक पडल्याने विहिरीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.नदी-नाले तुडुंब भरले आहेत. ओढ्यांना पहिल्या पावसात खळखळ पाणी वाहत आहे. त्यामुळे खरीप हंगामात काढल्या जाणाºया पिकांना पाण्याची चणचण जाणवणार नाही म्हणून अनेक शेतकºयांनी नगदी पिकांची जोरदार तयारी सुरू केली आहे.तालुक्यांमध्ये खरीप हंगामात सर्वात महत्त्वाचे आणि मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाºया टमाटे पिकाच्या लागवडीसाठी शेतकºयांनी तयारी सुरू केली आहे. कोबी, फ्लॉवर, भाजीपाला, वांगी, टोमॅटो यांसारख्या नगदी पिकांची जोरदार तयारी सुरू केली असून, अशी पिके उभी करण्यासाठी शेतकºयांना प्रचंड प्रमाणामध्ये भाग भांडवल खर्च करावे लागत आहे.खरीप हंगामातील पिकांची जोरदार लागवड सुरू असली तरी भविष्यात कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाने विक्र ीसाठी प्रचंड अडचणी निर्माण होण्याची भीती शेतकºयांच्या मनामध्ये कायम आहे. एकंदरीत शेतकरी आपले सर्व दु:ख विसरून उमेदीने शेतात पिकांची उभारणी करीत आहे.