शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पावसाच्या उघडीपमुळे शेतीकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:50 IST

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये चांगला व उत्तम प्रकारचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे.

ठळक मुद्देखरीपाच्या लागवडीसाठी शेतकरी सज्ज; कोरोनामुळे विक्र ीची भीती कायम

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये चांगला व उत्तम प्रकारचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे.पाऊस वेळेवर पडल्याने खरीप हंगामातील पिकांची लागवड आणि पेरणी योग्य वेळेत होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदा जोरदार पाऊस होणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकºयांनी नगदी पिकांकडे कल वाढविलेला दिसत असला तरी कोरोनाच्या भीतीमुळे तयार झालेले पीक बाजारात विकता येईल की नाही किंवा बाजार समित्या वेळेवर चालू राहतील की नाही याची भीती शेतकºयांच्या मनामध्ये मात्र कायम आहे.अनेक वर्षांपासून जून महिन्यामध्ये फारसा पाऊस पडत नाही, जुलै महिन्यात सुरू होणारा पाऊस पुढे आॅक्टोबर-नोव्हेंबरला जोरदार पडत होता. त्यामुळे खरीप पिकांची लागवडदेखील जुलै-आॅगस्ट महिन्यात खºया अर्थाने सुरू होत असे, यंदा मात्र जून महिना सुरू होताच पावसाने दमदार हजेरी लावली आणि सगळ्याच भागांमध्ये मुबलक पडल्याने विहिरीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.नदी-नाले तुडुंब भरले आहेत. ओढ्यांना पहिल्या पावसात खळखळ पाणी वाहत आहे. त्यामुळे खरीप हंगामात काढल्या जाणाºया पिकांना पाण्याची चणचण जाणवणार नाही म्हणून अनेक शेतकºयांनी नगदी पिकांची जोरदार तयारी सुरू केली आहे.तालुक्यांमध्ये खरीप हंगामात सर्वात महत्त्वाचे आणि मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाºया टमाटे पिकाच्या लागवडीसाठी शेतकºयांनी तयारी सुरू केली आहे. कोबी, फ्लॉवर, भाजीपाला, वांगी, टोमॅटो यांसारख्या नगदी पिकांची जोरदार तयारी सुरू केली असून, अशी पिके उभी करण्यासाठी शेतकºयांना प्रचंड प्रमाणामध्ये भाग भांडवल खर्च करावे लागत आहे.खरीप हंगामातील पिकांची जोरदार लागवड सुरू असली तरी भविष्यात कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाने विक्र ीसाठी प्रचंड अडचणी निर्माण होण्याची भीती शेतकºयांच्या मनामध्ये कायम आहे. एकंदरीत शेतकरी आपले सर्व दु:ख विसरून उमेदीने शेतात पिकांची उभारणी करीत आहे.