शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पावसाच्या उघडीपमुळे शेतीकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:50 IST

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये चांगला व उत्तम प्रकारचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे.

ठळक मुद्देखरीपाच्या लागवडीसाठी शेतकरी सज्ज; कोरोनामुळे विक्र ीची भीती कायम

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये चांगला व उत्तम प्रकारचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे.पाऊस वेळेवर पडल्याने खरीप हंगामातील पिकांची लागवड आणि पेरणी योग्य वेळेत होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदा जोरदार पाऊस होणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकºयांनी नगदी पिकांकडे कल वाढविलेला दिसत असला तरी कोरोनाच्या भीतीमुळे तयार झालेले पीक बाजारात विकता येईल की नाही किंवा बाजार समित्या वेळेवर चालू राहतील की नाही याची भीती शेतकºयांच्या मनामध्ये मात्र कायम आहे.अनेक वर्षांपासून जून महिन्यामध्ये फारसा पाऊस पडत नाही, जुलै महिन्यात सुरू होणारा पाऊस पुढे आॅक्टोबर-नोव्हेंबरला जोरदार पडत होता. त्यामुळे खरीप पिकांची लागवडदेखील जुलै-आॅगस्ट महिन्यात खºया अर्थाने सुरू होत असे, यंदा मात्र जून महिना सुरू होताच पावसाने दमदार हजेरी लावली आणि सगळ्याच भागांमध्ये मुबलक पडल्याने विहिरीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.नदी-नाले तुडुंब भरले आहेत. ओढ्यांना पहिल्या पावसात खळखळ पाणी वाहत आहे. त्यामुळे खरीप हंगामात काढल्या जाणाºया पिकांना पाण्याची चणचण जाणवणार नाही म्हणून अनेक शेतकºयांनी नगदी पिकांची जोरदार तयारी सुरू केली आहे.तालुक्यांमध्ये खरीप हंगामात सर्वात महत्त्वाचे आणि मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाºया टमाटे पिकाच्या लागवडीसाठी शेतकºयांनी तयारी सुरू केली आहे. कोबी, फ्लॉवर, भाजीपाला, वांगी, टोमॅटो यांसारख्या नगदी पिकांची जोरदार तयारी सुरू केली असून, अशी पिके उभी करण्यासाठी शेतकºयांना प्रचंड प्रमाणामध्ये भाग भांडवल खर्च करावे लागत आहे.खरीप हंगामातील पिकांची जोरदार लागवड सुरू असली तरी भविष्यात कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाने विक्र ीसाठी प्रचंड अडचणी निर्माण होण्याची भीती शेतकºयांच्या मनामध्ये कायम आहे. एकंदरीत शेतकरी आपले सर्व दु:ख विसरून उमेदीने शेतात पिकांची उभारणी करीत आहे.