शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पाटणे परिसरात खरीप पेरण्यांच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:12 IST

मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात खरीप पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी आवश्यक पेरणीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी मग्न झाला आहे. ...

मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात खरीप पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी आवश्यक पेरणीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी मग्न झाला आहे. सर्वत्र कामाची लगबग बघावयास मिळत आहे .खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे बऱ्याचअंशी ट्रॅक्‍टरने केली जात आहेत. उर्वरित शेतकरी बैलजोडीद्वारे मशागत करत आहेत. डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टर व बैलजोडीद्वारे मशागतीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

खरीप हंगामातील पिकांच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमिनीची पेरणीपूर्व मशागत होणे अत्यंत गरजेचे असते. जमीन भुसभुशीत व तणविरहीत केल्यास जमीन पेरणीयोग्य होते. बळीराजाला उत्पादन चांगले मिळू शकते. मशागतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून ओलावा टिकून राहतो. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीत हवा खेळती राहून ती पिकांना पोषक ठरते. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता व वाढ जोमाने होऊन उत्पन्नात वाढ होते .खरीप हंगामावर शेतकऱ्यांची आशा जास्त असते. कारण विहिरींना पाणी असेल तरच रब्बीची पिके घेता येतात. त्यामुळे सर्वच शेतकरी फक्त खरिपाच्या पिकावर अपेक्षा ठेवून असतात. यावर्षीही पाऊस चांगला राहील, असा अंदाज असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, बळीराजा उत्साहाने मशागतीत मग्न झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मुबलक प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरिपाची पिके जोमदार असतात. परंतु काढणीयोग्य झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने बळीराजा हवालदिल झालेला आहे . बळीराजा खरिपाच्या पिकासाठी पेरणीपूर्व मशागत, पेरणी, बियाणे, खते यासाठी लागणारा पैसा कसा उभा करावा, या समस्येने धास्तावला आहे. कारण नुकतीच मशागतीची वाढलेली मजुरी तसेच रासायनिक खताच्या भरमसाठ वाढलेल्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने शेती कशी करावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन रासायनिक खतांच्या वाढीव किमती कमी करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे . पाटणे परिसरात उन्हाचा तडाखा, कोरोनाचे सावट, आर्थिक अडचण अशा सर्व समस्या असतानाही बळीराजा खरिपाच्या लागवडीपूर्व मशागतीत व्यस्त आहे.

कोट...

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शेतमालाला भाव नाही. मार्केट बंद आहेत. अशातच डिझेलचे भाव वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे. नुकतेच खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी कशी करावी. बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने दखल घेऊन रासायनिक खताचे भाव कमी करावेत. शेतकऱ्यांना बांधावरच खत आणि बियाणे मिळवून देण्याची व्यवस्था करावी.

- वसंत अहिरे, संचालक, वि. का. सोसायटी, पाटणे