शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पाटणे परिसरात खरीप पेरण्यांच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:12 IST

मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात खरीप पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी आवश्यक पेरणीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी मग्न झाला आहे. ...

मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात खरीप पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी आवश्यक पेरणीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी मग्न झाला आहे. सर्वत्र कामाची लगबग बघावयास मिळत आहे .खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे बऱ्याचअंशी ट्रॅक्‍टरने केली जात आहेत. उर्वरित शेतकरी बैलजोडीद्वारे मशागत करत आहेत. डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टर व बैलजोडीद्वारे मशागतीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

खरीप हंगामातील पिकांच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमिनीची पेरणीपूर्व मशागत होणे अत्यंत गरजेचे असते. जमीन भुसभुशीत व तणविरहीत केल्यास जमीन पेरणीयोग्य होते. बळीराजाला उत्पादन चांगले मिळू शकते. मशागतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून ओलावा टिकून राहतो. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीत हवा खेळती राहून ती पिकांना पोषक ठरते. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता व वाढ जोमाने होऊन उत्पन्नात वाढ होते .खरीप हंगामावर शेतकऱ्यांची आशा जास्त असते. कारण विहिरींना पाणी असेल तरच रब्बीची पिके घेता येतात. त्यामुळे सर्वच शेतकरी फक्त खरिपाच्या पिकावर अपेक्षा ठेवून असतात. यावर्षीही पाऊस चांगला राहील, असा अंदाज असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, बळीराजा उत्साहाने मशागतीत मग्न झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मुबलक प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरिपाची पिके जोमदार असतात. परंतु काढणीयोग्य झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने बळीराजा हवालदिल झालेला आहे . बळीराजा खरिपाच्या पिकासाठी पेरणीपूर्व मशागत, पेरणी, बियाणे, खते यासाठी लागणारा पैसा कसा उभा करावा, या समस्येने धास्तावला आहे. कारण नुकतीच मशागतीची वाढलेली मजुरी तसेच रासायनिक खताच्या भरमसाठ वाढलेल्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने शेती कशी करावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन रासायनिक खतांच्या वाढीव किमती कमी करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे . पाटणे परिसरात उन्हाचा तडाखा, कोरोनाचे सावट, आर्थिक अडचण अशा सर्व समस्या असतानाही बळीराजा खरिपाच्या लागवडीपूर्व मशागतीत व्यस्त आहे.

कोट...

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शेतमालाला भाव नाही. मार्केट बंद आहेत. अशातच डिझेलचे भाव वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे. नुकतेच खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी कशी करावी. बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने दखल घेऊन रासायनिक खताचे भाव कमी करावेत. शेतकऱ्यांना बांधावरच खत आणि बियाणे मिळवून देण्याची व्यवस्था करावी.

- वसंत अहिरे, संचालक, वि. का. सोसायटी, पाटणे