शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

पाटणे परिसरात खरीप पेरण्यांच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:12 IST

मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात खरीप पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी आवश्यक पेरणीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी मग्न झाला आहे. ...

मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात खरीप पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी आवश्यक पेरणीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी मग्न झाला आहे. सर्वत्र कामाची लगबग बघावयास मिळत आहे .खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे बऱ्याचअंशी ट्रॅक्‍टरने केली जात आहेत. उर्वरित शेतकरी बैलजोडीद्वारे मशागत करत आहेत. डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टर व बैलजोडीद्वारे मशागतीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

खरीप हंगामातील पिकांच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमिनीची पेरणीपूर्व मशागत होणे अत्यंत गरजेचे असते. जमीन भुसभुशीत व तणविरहीत केल्यास जमीन पेरणीयोग्य होते. बळीराजाला उत्पादन चांगले मिळू शकते. मशागतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून ओलावा टिकून राहतो. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीत हवा खेळती राहून ती पिकांना पोषक ठरते. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता व वाढ जोमाने होऊन उत्पन्नात वाढ होते .खरीप हंगामावर शेतकऱ्यांची आशा जास्त असते. कारण विहिरींना पाणी असेल तरच रब्बीची पिके घेता येतात. त्यामुळे सर्वच शेतकरी फक्त खरिपाच्या पिकावर अपेक्षा ठेवून असतात. यावर्षीही पाऊस चांगला राहील, असा अंदाज असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, बळीराजा उत्साहाने मशागतीत मग्न झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मुबलक प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरिपाची पिके जोमदार असतात. परंतु काढणीयोग्य झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने बळीराजा हवालदिल झालेला आहे . बळीराजा खरिपाच्या पिकासाठी पेरणीपूर्व मशागत, पेरणी, बियाणे, खते यासाठी लागणारा पैसा कसा उभा करावा, या समस्येने धास्तावला आहे. कारण नुकतीच मशागतीची वाढलेली मजुरी तसेच रासायनिक खताच्या भरमसाठ वाढलेल्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने शेती कशी करावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन रासायनिक खतांच्या वाढीव किमती कमी करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे . पाटणे परिसरात उन्हाचा तडाखा, कोरोनाचे सावट, आर्थिक अडचण अशा सर्व समस्या असतानाही बळीराजा खरिपाच्या लागवडीपूर्व मशागतीत व्यस्त आहे.

कोट...

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शेतमालाला भाव नाही. मार्केट बंद आहेत. अशातच डिझेलचे भाव वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे. नुकतेच खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी कशी करावी. बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने दखल घेऊन रासायनिक खताचे भाव कमी करावेत. शेतकऱ्यांना बांधावरच खत आणि बियाणे मिळवून देण्याची व्यवस्था करावी.

- वसंत अहिरे, संचालक, वि. का. सोसायटी, पाटणे