शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:54 IST

देवगाव : जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या; मात्र आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने हालचालींना वेग आला असून चर्चाही रंगू लागल्या आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया होती. यंदा सदर फॉर्म्युला बदलण्यात आला असून, आता ग्रामपंचायत सदस्यच सरपंच ठरविणार आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी, पेगलवाडी आणि शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागातील गावगाडा हाकणारे सरपंचपद हे प्रतिष्ठेचे मानले जाते. ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने ऐन थंडीत गावगाड्याचे वातावरण तापणार असून, निवडणुका रंगतदार होणार आहेत. गेल्या सात-आठ महिन्यांपासून बंद असलेल्या निवडणुकीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे थंडावलेल्या चर्चा आता चांगल्याच रंगू लागल्या आहेत. कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका अर्ध्यातच थांबविण्यात आल्या होत्या. त्यानंतर ग्रामपंचायत व पंचायत विभागातील विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून प्रशासक नेमण्यात आले होते, ते आजतागायत कायम आहेत. मात्र, आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वांनाच निवडणुकीचे वेध लागले आहेत.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम दुरुस्तीनुसार सरपंच निवड सदस्यांमधून होणार असल्याने त्यामुळे गावोगावी पॅनल टू पॅनल सामना रंगणार आहे. सत्तेत कोण जाणार आणि विरोधी बाकावर कोण बसणार याची चर्चा रंगू लागली आहे. प्रत्येक कार्यकर्ता नियोजन करीत उमेदवाराची चाचपणी करण्याच्या तयारीला लागला आहे. सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने सदस्यांचे भाव वाढणार असून त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. सरपंचाच्या दावेदारांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. इच्छुक उमेदवार तयार करणे, गाठीभेटी घेणे, पॅनल तयार करणे, तहसील किंवा तत्सम ठिकाणी जाऊन कागदपत्रांची जुळवाजुळव करणे या कामासाठी गावपुढाऱ्यांची तालुक्याच्या ठिकाणी वर्दळ वाढली असून हळूहळू ग्रामपंचायत निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.