शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:54 IST

देवगाव : जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या; मात्र आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने हालचालींना वेग आला असून चर्चाही रंगू लागल्या आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया होती. यंदा सदर फॉर्म्युला बदलण्यात आला असून, आता ग्रामपंचायत सदस्यच सरपंच ठरविणार आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी, पेगलवाडी आणि शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागातील गावगाडा हाकणारे सरपंचपद हे प्रतिष्ठेचे मानले जाते. ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने ऐन थंडीत गावगाड्याचे वातावरण तापणार असून, निवडणुका रंगतदार होणार आहेत. गेल्या सात-आठ महिन्यांपासून बंद असलेल्या निवडणुकीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे थंडावलेल्या चर्चा आता चांगल्याच रंगू लागल्या आहेत. कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका अर्ध्यातच थांबविण्यात आल्या होत्या. त्यानंतर ग्रामपंचायत व पंचायत विभागातील विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून प्रशासक नेमण्यात आले होते, ते आजतागायत कायम आहेत. मात्र, आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वांनाच निवडणुकीचे वेध लागले आहेत.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम दुरुस्तीनुसार सरपंच निवड सदस्यांमधून होणार असल्याने त्यामुळे गावोगावी पॅनल टू पॅनल सामना रंगणार आहे. सत्तेत कोण जाणार आणि विरोधी बाकावर कोण बसणार याची चर्चा रंगू लागली आहे. प्रत्येक कार्यकर्ता नियोजन करीत उमेदवाराची चाचपणी करण्याच्या तयारीला लागला आहे. सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने सदस्यांचे भाव वाढणार असून त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. सरपंचाच्या दावेदारांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. इच्छुक उमेदवार तयार करणे, गाठीभेटी घेणे, पॅनल तयार करणे, तहसील किंवा तत्सम ठिकाणी जाऊन कागदपत्रांची जुळवाजुळव करणे या कामासाठी गावपुढाऱ्यांची तालुक्याच्या ठिकाणी वर्दळ वाढली असून हळूहळू ग्रामपंचायत निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.