शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

मुबलक पाणी...तरीही टंचाई

By admin | Updated: March 10, 2017 02:05 IST

जिल्हा प्रशासनाला यंदा धरणांची स्थिती पाहून काहीसे हायसे वाटू लागले असले तरी, मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा जबरदस्त तडाखा बसू लागल्याने ज्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे

 श्याम बागुल  नाशिकगत वर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम पाण्याचा साठा असताना, पाण्याची सातत्याने होणारी मागणी व त्याचा पुरवठा करण्यात दमछाक झालेल्या जिल्हा प्रशासनाला यंदा धरणांची स्थिती पाहून काहीसे हायसे वाटू लागले असले तरी, मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा जबरदस्त तडाखा बसू लागल्याने ज्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे त्याचप्रमाणात धरणांच्या पाण्याचे बाष्पीभवनही झपाट्याने होऊन पातळी कमी होत चालली आहे. मुळात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे डिसेंबर, जानेवारीत पिकांसाठी किंबहुना रब्बीसाठी राखून ठेवलेले पाणी सोडण्याची वेळ तशी प्रशासनावर आली नाही, मात्र नजीकच्या काळात अशीच परिस्थिती असेल याविषयी कोणीच खात्री देऊ शकत नाही. जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, सिन्नर या तालुक्यांना मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची टंचाई भासू लागली असून, मालेगाव तालुक्यातील दुंधे येथे पहिला टॅँकर सुरू करण्यात आला, त्यापाठोपाठ बागलाण तालुक्यात तीन टॅँकर सुरू झाले आहेत. दुसरीकडे उन्हाळी पिकांसाठी धरणातून आवर्तन सोडावे यासाठी शेतकरी आग्रही झाले असून, गावोगावी बैठका, आंदोलनाची रूपरेषा ठरू लागली आहे. धरणांमध्ये पाण्याचा साठा असूनही सरकार मुद्दाम शेतीला व पिण्याला पाणी देत नसल्याची भावना वाढीस लागली असून, जिल्ह्यातील धरणांचे पाणी अन्य जिल्ह्यांकडे वळविले जात असल्याचा समज झपाट्याने पसरला आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या तीन महिन्यांच्या काळात धरणातील ४२ टक्के साठ्यावर तहान भागवावी लागणार आहे.

गंगापूरमधून आवर्तन सुरू

नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागाला व लगतच्या जिल्ह्यांची तृष्णा भागविणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ३१०४ दशलक्ष घनफूट म्हणजेच धरण क्षमतेच्या ५५ टक्के इतके पाणी शिल्लक असले तरी, त्यात नाशिक महापालिकेचे आरक्षण आहे. या शिवाय सातपूर, अंबड औद्योगिक वसाहत, त्र्यंबक नगरपालिका, एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पासाठीदेखील पाणी आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. गंगापूर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. सध्या गंगापूर धरणातून एकलहरा औष्णिक केंद्रासाठी पाणी सोडले जात आहे.४चालू महिन्यात ३१५ दशलक्ष घनफूट, एप्रिल ते मे महिन्यात २९० व मेअखेरीस २६० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार असल्याने गोदावरीत पाणी खळाळेल. या शिवाय हिवाळी व उन्हाळी पिकांसाठीही पाण्याचे आरक्षण असल्याने हिवाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची फारशी वेळ आलेली नाही, मात्र उन्हाळी पिकांसाठी मागणी वाढू लागल्याने सिंचनासाठी पाणी सोडतानाच, डाव्या कालव्यावर येणाऱ्या कसबे सुकेणे पाणीपुरवठा योजना, पिंप्रीसय्यद योजना, मेरी पाणीपुरवठा योजनेसाठीही याचवेळी पाणी सोडले जाणार आहे. जेणे करून पाण्याची गळती रोखण्यास मदत होते. गंगापूर धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या माध्यमातून नाशिक, निफाड तालुक्यांतील गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी सोडले जाते. गंगापूर धरण समूहात कश्यपि व गोतमी गोदावरी या दोन धरणांचा समावेश होतो, परंतु या दोन्ही मध्यम धरणातील पाणी गंगापूर धरणातच सोडले जाते. त्यामुळे या दोन्ही धरणांच्या पाण्यावर कोणतेही आरक्षण नाही.