शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक पाणी...तरीही टंचाई

By admin | Updated: March 10, 2017 02:05 IST

जिल्हा प्रशासनाला यंदा धरणांची स्थिती पाहून काहीसे हायसे वाटू लागले असले तरी, मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा जबरदस्त तडाखा बसू लागल्याने ज्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे

 श्याम बागुल  नाशिकगत वर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम पाण्याचा साठा असताना, पाण्याची सातत्याने होणारी मागणी व त्याचा पुरवठा करण्यात दमछाक झालेल्या जिल्हा प्रशासनाला यंदा धरणांची स्थिती पाहून काहीसे हायसे वाटू लागले असले तरी, मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा जबरदस्त तडाखा बसू लागल्याने ज्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे त्याचप्रमाणात धरणांच्या पाण्याचे बाष्पीभवनही झपाट्याने होऊन पातळी कमी होत चालली आहे. मुळात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे डिसेंबर, जानेवारीत पिकांसाठी किंबहुना रब्बीसाठी राखून ठेवलेले पाणी सोडण्याची वेळ तशी प्रशासनावर आली नाही, मात्र नजीकच्या काळात अशीच परिस्थिती असेल याविषयी कोणीच खात्री देऊ शकत नाही. जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, सिन्नर या तालुक्यांना मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची टंचाई भासू लागली असून, मालेगाव तालुक्यातील दुंधे येथे पहिला टॅँकर सुरू करण्यात आला, त्यापाठोपाठ बागलाण तालुक्यात तीन टॅँकर सुरू झाले आहेत. दुसरीकडे उन्हाळी पिकांसाठी धरणातून आवर्तन सोडावे यासाठी शेतकरी आग्रही झाले असून, गावोगावी बैठका, आंदोलनाची रूपरेषा ठरू लागली आहे. धरणांमध्ये पाण्याचा साठा असूनही सरकार मुद्दाम शेतीला व पिण्याला पाणी देत नसल्याची भावना वाढीस लागली असून, जिल्ह्यातील धरणांचे पाणी अन्य जिल्ह्यांकडे वळविले जात असल्याचा समज झपाट्याने पसरला आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या तीन महिन्यांच्या काळात धरणातील ४२ टक्के साठ्यावर तहान भागवावी लागणार आहे.

गंगापूरमधून आवर्तन सुरू

नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागाला व लगतच्या जिल्ह्यांची तृष्णा भागविणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ३१०४ दशलक्ष घनफूट म्हणजेच धरण क्षमतेच्या ५५ टक्के इतके पाणी शिल्लक असले तरी, त्यात नाशिक महापालिकेचे आरक्षण आहे. या शिवाय सातपूर, अंबड औद्योगिक वसाहत, त्र्यंबक नगरपालिका, एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पासाठीदेखील पाणी आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. गंगापूर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. सध्या गंगापूर धरणातून एकलहरा औष्णिक केंद्रासाठी पाणी सोडले जात आहे.४चालू महिन्यात ३१५ दशलक्ष घनफूट, एप्रिल ते मे महिन्यात २९० व मेअखेरीस २६० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार असल्याने गोदावरीत पाणी खळाळेल. या शिवाय हिवाळी व उन्हाळी पिकांसाठीही पाण्याचे आरक्षण असल्याने हिवाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची फारशी वेळ आलेली नाही, मात्र उन्हाळी पिकांसाठी मागणी वाढू लागल्याने सिंचनासाठी पाणी सोडतानाच, डाव्या कालव्यावर येणाऱ्या कसबे सुकेणे पाणीपुरवठा योजना, पिंप्रीसय्यद योजना, मेरी पाणीपुरवठा योजनेसाठीही याचवेळी पाणी सोडले जाणार आहे. जेणे करून पाण्याची गळती रोखण्यास मदत होते. गंगापूर धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या माध्यमातून नाशिक, निफाड तालुक्यांतील गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी सोडले जाते. गंगापूर धरण समूहात कश्यपि व गोतमी गोदावरी या दोन धरणांचा समावेश होतो, परंतु या दोन्ही मध्यम धरणातील पाणी गंगापूर धरणातच सोडले जाते. त्यामुळे या दोन्ही धरणांच्या पाण्यावर कोणतेही आरक्षण नाही.