शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

धरणात मुबलक साठा; दोन वेळ करा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 15:36 IST

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत आणि आता जायकवाडीही पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, दोन वेळ पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. बुधवारी (दि.२७) शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी, आयुक्तांनी पाणीपुरवठा वितरणाची माहिती मागवत योग्य तो ...

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत आणि आता जायकवाडीही पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, दोन वेळ पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. बुधवारी (दि.२७) शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी, आयुक्तांनी पाणीपुरवठा वितरणाची माहिती मागवत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासित केले.महापालिकेतील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले, शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे जवळपास शंभर टक्के भरलेली आहेत. त्यामुळे शहराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाला शहरापेक्षा ज्या जायकवाडी धरणाला नाशिककरांचे हक्काचे पिण्याचे पाणी सोडण्याची घाई असते, ते धरणदेखील पूर्णपणे भरून विसर्ग केला जात आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही शहरातील कित्येक भागात केवळ एक वेळ पाणीपुरवठा अत्यंत अपुºया दाबाने केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजेइतकेही पाणी उपलब्ध होत नाही. त्यात पाणीपुरवठा वितरण यंत्रणेचा दोष प्रामुख्याने दिसून येत आहे. धरणे भरली असतानाही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणी असूनही टंचाईची स्थिती असल्याने लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची मुबलक उपलब्धता लक्षात घेता शहरातील सर्व भागात दोन वेळचा पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी बोरस्ते यांनी केली. यावेळी सेना नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील पाणीपुरवठ्यासंबंधीच्या अडचणी कथन केल्या. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना पाचारण करत त्यांच्याकडून वितरण स्थितीचा अहवाल मागविला आहे.