शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धरणात मुबलक साठा; दोन वेळ करा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:20 IST

शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत आणि आता जायकवाडीही पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, दोन वेळ पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. बुधवारी (दि.२७) शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन सादर केले.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत आणि आता जायकवाडीही पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, दोन वेळ पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. बुधवारी (दि.२७) शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी, आयुक्तांनी पाणीपुरवठा वितरणाची माहिती मागवत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासित केले.महापालिकेतील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले, शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे जवळपास शंभर टक्के भरलेली आहेत. त्यामुळे शहराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाला शहरापेक्षा ज्या जायकवाडी धरणाला नाशिककरांचे हक्काचे पिण्याचे पाणी सोडण्याची घाई असते, ते धरणदेखील पूर्णपणे भरून विसर्ग केला जात आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही शहरातील कित्येक भागात केवळ एक वेळ पाणीपुरवठा अत्यंत अपुºया दाबाने केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजेइतकेही पाणी उपलब्ध होत नाही. त्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणी असूनही टंचाईची स्थिती असल्याने लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची मुबलक उपलब्धता लक्षात घेता शहरातील सर्व भागात दोन वेळचा पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी बोरस्ते यांनी केली. यावेळी सेना नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील पाणीपुरवठ्यासंबंधीच्या अडचणी कथन केल्या. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना पाचारण करत त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे.