शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:23 IST

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू असताना या सुनावणीमध्ये नेमके काय आढळत आहे याची कोणतीही माहिती समोर येत नसल्याने दोषी शिक्षकांना अभय दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देअहवाल गुलदस्त्यात : कुणावरही कारवाई नाहीखोटी माहिती भरूनही पदस्थापना काय

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू असताना या सुनावणीमध्ये नेमके काय आढळत आहे याची कोणतीही माहिती समोर येत नसल्याने दोषी शिक्षकांना अभय दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.अखेरच्या रॅण्डम राउंडमध्ये अवघड क्षेत्रात बदली झाल्याने या शिक्षकांनी न्यायासाठी जिल्हा परिषदेपासून, विभागीय आयुक्त तसेच न्यायालयाचेदेखील दरवाजे ठोठावले आहेत. जिल्हा परिषदेला सर्व प्रकारच पुरावे देऊनही जिल्हा परिषदेने नेमकी कशी तपासणी केली आणि कागदपत्रांची सतत्या कशी तपासून पाहिली याची माहितीच समोर येत नसल्याने ही संपूर्ण यंत्रणा चुकीच्या शिक्षकांना अभय देण्याच्या मानसिकतेत असल्याचा संशय आहे.गेल्या २० तारखेपासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. प्रत्यक्ष संबंधित शिक्षकांनादेखील बाजू मांडण्यास सांगितले जात आहे. मात्र हा चौकशीचा निव्वळ फार्स असून, अनेक शिक्षकांची कागदपत्रे बनावट आढळली असूनही असे किती शिक्षक जिल्हा परिषदेच्या रडारवर आहेत याची माहिती मात्र दिली जात नाही.ग्रामसेवक असो की अंगणवाडीसेविका, अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखणे असो की चुकीची माहिती दिल्याने ग्रामसेवकाचे निलंब, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राधान्याने याची माहिती माध्यमांपर्यंत पोहचवित असतात. परंतु चुकीच्या बदल्या पदरात पाडून घेताना शासानची दिशाभूल करणाºया संबंधित शिक्षकांवरील कारवाईबाबत कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूणच चौकशी प्रकरणावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषदेने दि.२०तारखेपर्यंत संशयास्पद शिक्षकांची चौकशी, सुनावणी करून त्यांच्यावर कारवाई, नवीन पदस्थापना आणि अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिलेले आहेत. मात्र दि.२६ तारीख उलटूनही जिल्हा परिषदेकडून अद्याप दोषी शिक्षकांबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.न्यायालयावरच आता शिक्षकांची भिस्तजिल्हा परिषदेकडून न्यायाची अपेक्षा नसल्याने अन्यायग्रस्त शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणाची सुनावणी येत्या मंगळवारी होणार असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वच शिक्षकांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण बदलीप्रक्रिया ही सदोष असल्याने आॅनलाइन मधील दुरुस्तीसह संपूर्ण प्रक्रियाच नव्याने राबविण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली असल्याने सुनावणीकडे लक्ष लागून आहे.