शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

दोन लाख निराधारांना ‘आधार’ प्रत्येकी एक हजाराची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST

ज्यांना कुणाचाही आधार नाही किंवा ज्यांचे पालन पोषण करण्यासाठी कुणीही नाही अशा नागरिकांना निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली ...

ज्यांना कुणाचाही आधार नाही किंवा ज्यांचे पालन पोषण करण्यासाठी कुणीही नाही अशा नागरिकांना निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग, निराधार यांचा समावेश आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना , इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अशा येाजनांच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावला जातो. दरमहा किमान ५०० ते १०० रुपये या योजनेत दिले जातात.

राज्य शासनाने केलेल्या घोषणेनुसार या योजनेतील लाभार्थ्यांना एक हजार रुपये दिले जाणार आहेत; मात्र अनेक लाभार्थ्यांनी नाराजीदेखील दर्शविली आहे. योजनेतील अनुदान हे आगाऊ दिले जाणार असल्याने पुढील महिन्यात योजनेचा लाभ मिळेल की नाही, याविषयी आताच शंका उपस्थित केली जात आहे.

--इन्फो--

याेजनेनिहाय लाभार्थी संख्या

संजय गांधी निराधार योजना: ३१६९२

श्रावणबाळ योजना:१,०५,६७२

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना: ६४५४३

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना:५८३५

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना: ५७३

--इन्फाे---

लाभार्थी म्हणतात...

संचारबंदीत दिव्यांगांची उपेक्षा झाली आहे. इतर बांधकाम मजूर, घरेलु कामगार, फेरीवाले यांना विशेष मदतीची घोषणा करण्यात आली आहे; मात्र शारीरिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या दिव्यांगांना संजय गांधी योजनेतून केवळ आगाऊ अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे नाराजी आहे.

- बबलू मिर्झा, दिव्यांग लाभार्थी

शासनाकडून मदतीची घाेषणा करण्यात आलेली आहे; मात्र प्रत्यक्षात मदतीच्या नावाखाली आपलीच रक्कम आपल्याला दिली जाणार आहे. त्यामुळे आगाऊ दिलेली रक्कम पुढील दोन महिन्यात मिळेल की नाही, याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही.

- नारायण कुयटे, लाभार्थी.

संचारबंदीच्या काळात आगाऊ रक्कम मिळणार असल्याने शासनाचे आभार मानले पाहिजे. योजनेतील लाभासाठी अगोदरच तीन ते चार महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे आगाऊ दोन महिन्यांची रक्कम मिळणार असल्याने त्या रकमेचा नक्कीच आधार होणार आहे.

- कैलास वारुंगसे, लाभार्थी.

संचारबंदीमुळे शासकीय कार्यालयात जाता येणार नाही. अनुदानासाठी नेहमीच शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. पुढील दोन महिन्यांची रक्कम आगाऊ मिळणार असली तरी त्यामुळे धावपळ वाचणार आहे. हातात असलेले दोन पैसे या काळात लाभदायकच ठरतील.

- कौशल्याबाई रत्नाकर, लाभार्थी.

राज्य शासनाने निराधार योजनेतील गरिबांना एक हजार रुपये देण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात अमलात लवकर यावी, अशी अपेक्षा आहे. कार्यालयात येण्यासाठी या काळात मोठी कसरत करावी लागेल. थेट खात्यात अनुदान जमा झाल्यामुळे धावपळ टळणार आहे.

- पवळाबाई गवारे. लाभार्थी.