शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रेशनकार्डला आधारलिंक बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 01:14 IST

रेशनकार्डचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला आता रेशनकार्ड आधार आणि मोबाइल क्रमांकाला लिंक करावे लागणार आहे. अन्न व पुरवठा विभागाने रेशन वितरण यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानांमध्ये जाऊन आधार लिंकींग करावे लागणार आहे. यातून गरजू लाभार्थी समोर येणार असून, बोगस रेशन कार्डधारकही समोर येणार आहेत.

ठळक मुद्देबोगस कार्ड शोधमोहीम: महिनाभराचा मिळेल कालावधी

नाशिक: रेशनकार्डचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला आता रेशनकार्ड आधार आणि मोबाइल क्रमांकाला लिंक करावे लागणार आहे. अन्न व पुरवठा विभागाने रेशन वितरण यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानांमध्ये जाऊन आधार लिंकींग करावे लागणार आहे. यातून गरजू लाभार्थी समोर येणार असून, बोगस रेशन कार्डधारकही समोर येणार आहेत.

स्वस्त धान्याचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळावा, याबरोबरच लाभार्थ्यांचे लिंकींग असावे, यासाठी अन्न व पुरवठा विभागाने या यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जानेवारी महिन्यात कार्डधारकांना लिंकींग करण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे. रेशन दुकानदारदेखील याबाबतची माहिती कार्डधारकांना देणार आहेत. या मोहिमेतून पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेले रेशनकार्डची मूळ संख्या समेार येणार असून, उर्वरित कार्ड बोगस म्हणून समोर येणार आहेत. लाभार्थ्यांनी रेशन कार्डला आधार व मोबाइल नंबर लिंक करणे बंधनकारक असून, त्यासाठी शासनाने ३१ जानेवारीची अंतिम मुदत दिली आहे.

             जिल्ह्यात विविध योजनांचे ३७ लाख रेशनधान्य लाभार्थी आहेत. रेशन प्रणालीतील अन्नधान्याचा लाभार्थ्यांनाच पुरवठा व्हावा, यासाठी ई-पाॅस यंत्रणा अमलात आणली आहे.आता अधिक काटेकोर पडताळणीसाठी कार्डधारकांचे आधार लिंकींग केले जात आहे. जवळच्या रेशन दुकानात जाऊन लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड आधार व मोबाइल नंबरशी लिंक करता येईल. १५ तालुक्यांमध्ये २ हजार ६०९ रेशन धान्य दुकाने असून, जवळपास ३८ लाख रेशन लाभार्थी आहेत. अंत्योदय योजनेचा लाभ घेणारे ८ लाख ८० हजार तर इतर योजनांचे २९ लाख लाभार्थी आहेत. जे लाभार्थी लिंक करणार नाही त्यांना १ फेब्रुवारीनंतर रेशन मिळणेच बंद होणार आहे.

 

--इन्फो--

अन्यथा १ फेब्रुवारीपासून रेशन बंद

जे लाभार्थी रेशन कार्डला लिंक करणार नाहीत, त्यांना १ फेब्रुवारीपासून रेशन मिळणे बंद होऊ शकते. रेशनच्या यंत्रणेत असलेल्या प्रत्येक कार्डधारकाला आता लिंकींग बंधनकारक करण्यात आल्याने रेशन बंदच्या भीतीने महिनाभरात कार्डधारकांची धावपळ होणार आहे. तांत्रिक अडचणी आल्या नाही, तर हे काम महिनाभरात पूर्ण होऊ शकते.

 

---कोट---

रेशनधान्याचा पुरवठा योग्य कार्डधारकांना व्हावा आणि जास्तीत जास्त लाभार्थी जोडले जावेत, यासाठी रेशन कार्ड आधार व मोबाइलनंबरशी लिंक करण्याची मोहीम सुरू केली जात आहे. लिंक न करणाऱ्या कार्डधारकांना अन्नधान्य वाटप केले जाणार नाही. लाभार्थ्यांनी रेशनच्या दुकानावर जाऊन कार्ड लिंक करून घ्यावे.

- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार