शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

जिल्ह्यात ९५९ कोटींचे अधिक खरीप पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:16 IST

नाशिक : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खरीप पीककर्जात मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९५९ कोटींचे अधिक कर्जवाटप ...

नाशिक : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खरीप पीककर्जात मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९५९ कोटींचे अधिक कर्जवाटप करण्यात आले आहे. गत चार वर्षातील हा खरीप पीककर्ज वितरणाचा उच्चांक असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा पतपुरवठा योजनेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी बॅंक्स अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लीड डिस्ट्रिक मॅनेजर अर्धेंदू शेखर, एसबीआय बॅंकेचे क्षेत्रिय सहायक महाप्रबंधक सफल त्रिपाठी, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, एनडीडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पिंगळे यांच्यासह इतर बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले की, मागील चार वर्षांचा शेती कर्जाचा आढावा घेतला असता २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ९५९ कोटी रुपयांनी अधिक पीककर्ज वितरण झाले आहे. जिल्ह्यात पीककर्ज वितरणात वाढ झाली असली तरी जिल्ह्यात शेतीची मुबलक कामे असल्याने त्यात वाढीचीदेखील शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेवर करून किंवा नूतनीकरण करून व्याज परताव्याचा लाभ घेतला पाहिजे. ज्यामुळे जिल्ह्यातील पतपुरवठ्यास चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

--काेट--

जिल्ह्याच्या पीककर्जाची आवश्यकता लक्षात घेता बँकांनी वास्तववादी लक्ष्य निश्चित केले पाहिजे. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी ते प्रभावी ठरेल. हे उद्दिष्ट लागवडीखालील जमीन आणि पिकाच्या उत्पादनास चालना देणारे व शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी प्रेरित करणारे असावे.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.