शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

जिल्ह्यात ८८ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:45 IST

नाशिक : जिल्ह्णात आतापर्यंत सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे बव्हंशी काम पूर्ण केले असले तरी जुलैच्या उत्तरार्धात मात्र पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची बरीच पिके संकटात आली असून, शेतकºयाला आता खरिपाची पिके वाचविण्यासाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देखरिपाला पावसाची प्रतीक्षा : ८७.६६ टक्के अन्नधान्य, तर ८७.३८ टक्के गळीत धान्य

नाशिक : जिल्ह्णात आतापर्यंत सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे बव्हंशी काम पूर्ण केले असले तरी जुलैच्या उत्तरार्धात मात्र पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची बरीच पिके संकटात आली असून, शेतकºयाला आता खरिपाची पिके वाचविण्यासाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.नाशिक जिल्ह्णात यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ७५ हजार ५९१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी पाच लाख ५ हजार ३७५ हेक्टर म्हणजेच सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली असून यात ३ लाख ५४ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. यात भात, ज्वारी, बाजरी, नागली, मका या पिकांसह चार हजार ३८४ हेक्टर क्षेत्रावरील अन्य तृणधान्य प्रकारातील पिकांचा समावेश आहे. तर जवळपास ३२ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर तूर, उडीद, मूग यांसारख्या कडधान्य पिकांसह तीन हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील अन्य कडधान्य पिकांचा समावेश आहे.जिल्ह्णात यावर्षी सुमारे ७६ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावर भुईमूग,सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, खुरासणीसह ८१५ हेक्टरवरील अन्य गळीत धान्य पिकांची पेरणी झाली आहे. यातील बहुतेक पेरणी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत झालेल्या पावसामुळे शक्य झाली असून, जुलैच्या उत्तरार्धात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.पेरणीची कामे जवळपास पूर्ण होत आलेली असताना अनेक भागात पिकांतर्गत मशागत सुरू असून, पिकांच्या चांगल्या वाढीसाठी शेतकºयांना आता चांगल्या पावसाची गरज आहे. कापसाची ९० टक्के लागवड नाशिक जिल्ह्णात सुमारे ४५ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात येते. त्यापैकी ४१ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच जवळपास ९०.५६ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. परंतु राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकºयांना भेडसावणारी बोंडअळीची समस्या नाशिक जिल्ह्णातील शेतकºयांसमोरही असून, पावसाने ओढे दिल्याने शेतकºयांसमोर सिंचनासोबतच रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.