शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८८ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:45 IST

नाशिक : जिल्ह्णात आतापर्यंत सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे बव्हंशी काम पूर्ण केले असले तरी जुलैच्या उत्तरार्धात मात्र पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची बरीच पिके संकटात आली असून, शेतकºयाला आता खरिपाची पिके वाचविण्यासाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देखरिपाला पावसाची प्रतीक्षा : ८७.६६ टक्के अन्नधान्य, तर ८७.३८ टक्के गळीत धान्य

नाशिक : जिल्ह्णात आतापर्यंत सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे बव्हंशी काम पूर्ण केले असले तरी जुलैच्या उत्तरार्धात मात्र पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची बरीच पिके संकटात आली असून, शेतकºयाला आता खरिपाची पिके वाचविण्यासाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.नाशिक जिल्ह्णात यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ७५ हजार ५९१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी पाच लाख ५ हजार ३७५ हेक्टर म्हणजेच सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली असून यात ३ लाख ५४ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. यात भात, ज्वारी, बाजरी, नागली, मका या पिकांसह चार हजार ३८४ हेक्टर क्षेत्रावरील अन्य तृणधान्य प्रकारातील पिकांचा समावेश आहे. तर जवळपास ३२ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर तूर, उडीद, मूग यांसारख्या कडधान्य पिकांसह तीन हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील अन्य कडधान्य पिकांचा समावेश आहे.जिल्ह्णात यावर्षी सुमारे ७६ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावर भुईमूग,सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, खुरासणीसह ८१५ हेक्टरवरील अन्य गळीत धान्य पिकांची पेरणी झाली आहे. यातील बहुतेक पेरणी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत झालेल्या पावसामुळे शक्य झाली असून, जुलैच्या उत्तरार्धात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.पेरणीची कामे जवळपास पूर्ण होत आलेली असताना अनेक भागात पिकांतर्गत मशागत सुरू असून, पिकांच्या चांगल्या वाढीसाठी शेतकºयांना आता चांगल्या पावसाची गरज आहे. कापसाची ९० टक्के लागवड नाशिक जिल्ह्णात सुमारे ४५ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात येते. त्यापैकी ४१ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच जवळपास ९०.५६ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. परंतु राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकºयांना भेडसावणारी बोंडअळीची समस्या नाशिक जिल्ह्णातील शेतकºयांसमोरही असून, पावसाने ओढे दिल्याने शेतकºयांसमोर सिंचनासोबतच रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.