शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून पाणीयोजनेसाठी ८२ कोटी

By admin | Updated: June 15, 2016 23:36 IST

सिन्नर : कडवातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प; जलकुंभासह योजनेचे काम प्रगतिपथावर

 शैलेश कर्पे । सिन्नरकडवा धरणातून सिन्नर शहर व उपनगरांसाठी महत्त्वाकांक्षी पाणीयोजना राबविण्यात येत असून, या योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. या योजनेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून सिन्नरकरांना भेडसावणारी पाणीटंचाई कायमस्वरूपी निकाली निघण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सदर योजना सिन्नरकरांसाठी नवसंजीवनी देणारी ठरणार आहे.कडवा धरणाची पाणीसाठवण क्षमता ६० दक्षलक्ष घनमीटर आहे. त्यातील ९.६६ दशलक्ष घनमीटर पाणी सिन्नरच्या पाणीयोजनेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेतून सिन्नरकरांना चोवीस तास पाणी मिळू शकेल, असा दावा नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी केला आहे.नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, उपनगराध्यक्ष संजय नवसे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नगरसेवक बापू गोजरे, मल्लू पाबळे, हर्षद देशमुख, राजश्री कपोते, सुजाता गाडे, उज्ज्वला खालकर, शीतल कानडी, लता हिले, मंगला जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव यांनी कडवा धरणावर जाऊन पाणीयोजनेच्या कामाची व जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करीत कामासंबंधी सूचना केल्या. कोनांबे शिवारात जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १८ दशलक्ष लिटर (एलएमडी) आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून साडेसात लाख लिटर तासी पाणी शुद्धीकरण केले जाणार आहे. सध्या सिन्नर शहर व उपनगरांना ६० लाख लिटर दररोज पाण्याची गरज भासते. कडवा धरणातून राबविण्यात येणाऱ्या पाणी योजनेतून दररोज आत्ताच्या तीनपट पाणी मिळू शकणार आहे. एक्स्प्रेस फीडरद्वारे चोवीस तास वीजपुरवठा ठेवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. धरणातील साठवण विहिरीतील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात नेण्यासाठी ४५० हॉर्सपॉवरचे तीन विद्युत जलपंप आहे. यातून तासी साडेसात लाख लिटर पाणी जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कडवा धरणातून होत असलेल्या पाणीयोजनेमुळे सिन्नरकरांची टंचाई कायमस्वरूपी दूर होईल, अशी अपेक्षा आहे.गेल्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे यांनी आघाडी शासनाच्या काळात पाठपुरावा करून केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी योजनेतून या योजनेसाठी ८२ कोटी रुपयांचा निधी मिळविला. या ८२ कोटी रुपयांच्या निधीतून सदर योजनेचे काम सुरू असून, बहुतांशी कामे पूर्ण झाली असल्याने येत्या काही दिवसात सिन्नरकरांना कडवा धरणातून पाण्याचे पाणी मिळण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)