शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

सिंचन प्रकल्पांसाठी ७८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:40 IST

बागलाण तालुक्यातील प्रलंबित हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालव्याच्या कामाला लवकरच गती मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या कामांसाठी पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा निर्णय वित्त विभागाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रलंबित हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालव्याच्या कामाला लवकरच गती मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या कामांसाठी पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा निर्णय वित्त विभागाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर, टेंभे, बिजोरसे, चिराई, बिलपुरी, श्रीपूरवडे, करंजाड, भुयाणे, पारनेर, डांगसौंदाणे, वटार, वाठोडा, दगडी साकोडे, भावनगर येथील शेतकºयांनी प्रलंबित सिंचनप्रश्नी डॉ. भामरे यांची धुळ्यात भेट घेतली. त्याप्रसंगी उपरोक्त माहिती दिली.तालुक्यातील विविध प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी सुमारे शंभर कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली. त्यापैकी हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, केळझर चारी क्रमांक ८, वाघंबा, हरणटेकडी वळण योजनासाठी सुमारे ७८ कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिल्याचे भामरे यांनी सांगितले. या कामांना गती मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात अठ्ठावन्न कोटी रु पयांचा निधी वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. संबंधित विभागाकडे हा निधी प्राप्त होताच या तिन्ही प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालावधीचे बंधन ठेवण्यातआले असून, आगामी पावसाळ्याच्या आत हे प्रकल्प पूर्णत्वास नेऊन पूरपाण्याने सदर प्रकल्पांची चाचणी घेण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी टेंभे येथील सरपंच भाऊसाहेब अहिरे, डांगसौंदाणे येथील तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे, पंचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, डॉ. सुधीर सोनवणे, रवींद्र सोनवणे, नितीन वाघ, अनिल पाटील, विजय काकडे, केवळ देवरे, राकेश देवरे, पंडित देवरे आदींसह दीडशे ते दोनशे शेतकरी उपस्थित होते.बंधारे दुरुस्त करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णयमोसम नदीवर पावसाचे पाणी अडविण्यासाठी आणि ही नदी बारमाही होण्याच्या दृष्टीने शासनाने ब्रिटिशकालीन बंधारे दुरुस्त करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या कामासाठी शासनाने सुमारे ७६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. हे काम निविदा स्तरावर असून, लवकरच या कामाला सुरु वात करण्यात येणार असल्याचे डॉ. भामरे यांनी यावेळी सांगितले. सटाणा येथील फड बागायतमधील पिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी हा कालवा जलवाहिन्या टाकून बंदिस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे पिकांना मुबलक पाणी मिळेल. या कामासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहितीही डॉ. भामरे यांनी दिली.