शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

मालेगावी २४ तासात ७७ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:49 IST

मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहोचली आहे.

मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहोचली आहे.मालेगाव शहरात ८ एप्रिलला पहिला रूग्ण सापडल्यानंतर शहराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. शहरात एका महिन्यातच रुग्णांचा आकडा ५०० च्या घरात जाऊन पोहोचला आहे. शुक्रवारी (दि.८) सकाळी २१, दुपारी १ तर सायंकाळी ६ याप्रमाणे एकूण २८ रुग्णांची वाढ झाली. यात २३ पुरुष तर ५ महिलांचा समावेश होता. महिला रुग्णांमध्ये एक दीड वर्षाच्या मुलीचा तर पुरुषांमध्ये २ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी (दि.९) आलेल्या अहवालात ४९ रुग्ण बाधित मिळून आले आहे. गेल्या २४ तासांत मालेगावात ७७ रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्ण संख्या ४९७ इतकी झाली आहे. यातील १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना स्वगृही पाठविण्यात आले. मालेगाव शहरासह तालुक्यातील रुग्णांमध्येदेखील वाढ होत असून, दाभाडी येथे ९, सवंदगाव १ तर चंदनपुरीत १ अशा ११ रुग्णांचा समावेश आहे.-----------------------------मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात द्या-भामरेमालेगाव : कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी मालेगाव मध्य मतदारसंघ सील करून लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणी आपण केंद्र व राज्य सरकारकडे केली असल्याचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे. त्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात भामरे यांनी मालेगाव बाह्यमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यास मालेगाव मध्यच जबाबदार असल्याचाही आरोप केला आहे.भामरे यांनी म्हटले आहे, मालेगाव मध्यमधील जनतेला कोरोनाचे गांभीर्य नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रशासन, पोलीस, डॉक्टर यांना सहकार्य होत नाही. अनेक वेळा पोलीस व डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. त्यासाठीच आपण गेल्या महिन्यापासून राज्य शासनाकडे मालेगाव मध्य सील करून लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी करीत आहोत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही दिले असून, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चादेखील झालेली आहे. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झालेली आहे. केंद्र सरकार मालेगाव मध्यमध्ये लष्कर पाठवायला तयार आहे, परंतु जोपर्यंत राज्य सरकार अधिकृत त्यासंदर्भात मागणी करीत नाही तोपर्यंत लष्कर पाठविता येत नाही. मालेगाव मध्यमधील लोक पोलीस प्रशासनाला दाद देत नाहीत, त्यामुळेच मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात देण्याची गरज असल्याचेही डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. महिनाभरापूर्वीच मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात दिले असते तर आज रुग्णांची वाढलेली संख्या दिसली नसती.

टॅग्स :Nashikनाशिक