शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

मालेगावी २४ तासात ७७ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:49 IST

मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहोचली आहे.

मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहोचली आहे.मालेगाव शहरात ८ एप्रिलला पहिला रूग्ण सापडल्यानंतर शहराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. शहरात एका महिन्यातच रुग्णांचा आकडा ५०० च्या घरात जाऊन पोहोचला आहे. शुक्रवारी (दि.८) सकाळी २१, दुपारी १ तर सायंकाळी ६ याप्रमाणे एकूण २८ रुग्णांची वाढ झाली. यात २३ पुरुष तर ५ महिलांचा समावेश होता. महिला रुग्णांमध्ये एक दीड वर्षाच्या मुलीचा तर पुरुषांमध्ये २ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी (दि.९) आलेल्या अहवालात ४९ रुग्ण बाधित मिळून आले आहे. गेल्या २४ तासांत मालेगावात ७७ रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्ण संख्या ४९७ इतकी झाली आहे. यातील १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना स्वगृही पाठविण्यात आले. मालेगाव शहरासह तालुक्यातील रुग्णांमध्येदेखील वाढ होत असून, दाभाडी येथे ९, सवंदगाव १ तर चंदनपुरीत १ अशा ११ रुग्णांचा समावेश आहे.-----------------------------मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात द्या-भामरेमालेगाव : कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी मालेगाव मध्य मतदारसंघ सील करून लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणी आपण केंद्र व राज्य सरकारकडे केली असल्याचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे. त्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात भामरे यांनी मालेगाव बाह्यमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यास मालेगाव मध्यच जबाबदार असल्याचाही आरोप केला आहे.भामरे यांनी म्हटले आहे, मालेगाव मध्यमधील जनतेला कोरोनाचे गांभीर्य नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रशासन, पोलीस, डॉक्टर यांना सहकार्य होत नाही. अनेक वेळा पोलीस व डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. त्यासाठीच आपण गेल्या महिन्यापासून राज्य शासनाकडे मालेगाव मध्य सील करून लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी करीत आहोत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही दिले असून, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चादेखील झालेली आहे. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झालेली आहे. केंद्र सरकार मालेगाव मध्यमध्ये लष्कर पाठवायला तयार आहे, परंतु जोपर्यंत राज्य सरकार अधिकृत त्यासंदर्भात मागणी करीत नाही तोपर्यंत लष्कर पाठविता येत नाही. मालेगाव मध्यमधील लोक पोलीस प्रशासनाला दाद देत नाहीत, त्यामुळेच मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात देण्याची गरज असल्याचेही डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. महिनाभरापूर्वीच मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात दिले असते तर आज रुग्णांची वाढलेली संख्या दिसली नसती.

टॅग्स :Nashikनाशिक