शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

मालेगावी २४ तासात ७७ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:49 IST

मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहोचली आहे.

मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहोचली आहे.मालेगाव शहरात ८ एप्रिलला पहिला रूग्ण सापडल्यानंतर शहराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. शहरात एका महिन्यातच रुग्णांचा आकडा ५०० च्या घरात जाऊन पोहोचला आहे. शुक्रवारी (दि.८) सकाळी २१, दुपारी १ तर सायंकाळी ६ याप्रमाणे एकूण २८ रुग्णांची वाढ झाली. यात २३ पुरुष तर ५ महिलांचा समावेश होता. महिला रुग्णांमध्ये एक दीड वर्षाच्या मुलीचा तर पुरुषांमध्ये २ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी (दि.९) आलेल्या अहवालात ४९ रुग्ण बाधित मिळून आले आहे. गेल्या २४ तासांत मालेगावात ७७ रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्ण संख्या ४९७ इतकी झाली आहे. यातील १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना स्वगृही पाठविण्यात आले. मालेगाव शहरासह तालुक्यातील रुग्णांमध्येदेखील वाढ होत असून, दाभाडी येथे ९, सवंदगाव १ तर चंदनपुरीत १ अशा ११ रुग्णांचा समावेश आहे.-----------------------------मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात द्या-भामरेमालेगाव : कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी मालेगाव मध्य मतदारसंघ सील करून लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणी आपण केंद्र व राज्य सरकारकडे केली असल्याचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे. त्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात भामरे यांनी मालेगाव बाह्यमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यास मालेगाव मध्यच जबाबदार असल्याचाही आरोप केला आहे.भामरे यांनी म्हटले आहे, मालेगाव मध्यमधील जनतेला कोरोनाचे गांभीर्य नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रशासन, पोलीस, डॉक्टर यांना सहकार्य होत नाही. अनेक वेळा पोलीस व डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. त्यासाठीच आपण गेल्या महिन्यापासून राज्य शासनाकडे मालेगाव मध्य सील करून लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी करीत आहोत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही दिले असून, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चादेखील झालेली आहे. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झालेली आहे. केंद्र सरकार मालेगाव मध्यमध्ये लष्कर पाठवायला तयार आहे, परंतु जोपर्यंत राज्य सरकार अधिकृत त्यासंदर्भात मागणी करीत नाही तोपर्यंत लष्कर पाठविता येत नाही. मालेगाव मध्यमधील लोक पोलीस प्रशासनाला दाद देत नाहीत, त्यामुळेच मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात देण्याची गरज असल्याचेही डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. महिनाभरापूर्वीच मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात दिले असते तर आज रुग्णांची वाढलेली संख्या दिसली नसती.

टॅग्स :Nashikनाशिक