शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

बागलाणच्या सिंचन प्रकल्पांसाठी ७७ कोटी

By admin | Updated: January 2, 2017 00:40 IST

सुभाष भामरे : ऐंशी गावांचा पाणीप्रश्न सुटेल

सटाणा : तालुक्यासाठी संजीवनी ठरणाऱ्या सिंचन प्रकल्पांच्या कालव्यांचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारकडून ७७ कोटी रु पयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रसिध्द होऊन कामाला सुरु वात करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने राज्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नाबार्ड कडून सतरा हजार कोटी रु पये मंजूर झाले आहेत. त्यातून बागलाणसाठी ७७ कोटी रु पयांचा निधी देण्यात आला आहे. हरणबारी डावा, उजवा कालवा, तळवाडे भामेर एक्सप्रेस कालवा व केळझर चारी क्र मांक आठ या सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. उजव्या कालव्याचे काम मार्गी लावण्यासाठी केंद्रीय जल आयोगाकडे तांत्रिक बाबींची पूर्तता केली जाईल. त्यांनतर पारनेर, बिजोटे, कोटबेल, खिरमानी, नळकस, सारदे, वायगाव, सातमाणे पर्यंत नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मेरीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हरणबारी डाव्या कालव्यासाठी ५५ कोटी, तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्यासाठी १५ व केळझर चारी क्र मांक आठच्या कामासाठी ७ कोटी असा ७७ कोटी रु पयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या निधीमुळे प्रकल्प पूर्णत्वास येऊन ऐशी गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. चारी क्रमांक आठचे काम मुळाणे पर्यंत पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत भाक्षी ,चौगाव ,कऱ्हे व अजमिर सौंदाणे पर्यंत सहा किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुनदच्या सुळे डावा कालव्याचे ४७ किलोमीटर पर्यंत काम पूर्ण झाले असून हा कालवा आरम नदी पात्रापर्यंत पूर्ण करून ते पाणी आराई ,सटाणा, मोरेनगर, ठेंगोडा, दह्याने, पिंपळदर, मुंजवाड गावांसाठी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा कडे सादर करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.सह्याद्री अतिथी गृहावर रविवारी डॉ.भामरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. मोरे, उप अभियंता दिलीप काळे, डॉ. शेषराव पाटील, कृती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, अण्णा अहीरे, रवींद्र खैरनार, जिभाऊ कोर, क्र ांती येवला उपस्थित होते. (वार्ताहर)