शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

बागलाणच्या सिंचन प्रकल्पांसाठी ७७ कोटी

By admin | Updated: January 2, 2017 00:40 IST

सुभाष भामरे : ऐंशी गावांचा पाणीप्रश्न सुटेल

सटाणा : तालुक्यासाठी संजीवनी ठरणाऱ्या सिंचन प्रकल्पांच्या कालव्यांचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारकडून ७७ कोटी रु पयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रसिध्द होऊन कामाला सुरु वात करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने राज्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नाबार्ड कडून सतरा हजार कोटी रु पये मंजूर झाले आहेत. त्यातून बागलाणसाठी ७७ कोटी रु पयांचा निधी देण्यात आला आहे. हरणबारी डावा, उजवा कालवा, तळवाडे भामेर एक्सप्रेस कालवा व केळझर चारी क्र मांक आठ या सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. उजव्या कालव्याचे काम मार्गी लावण्यासाठी केंद्रीय जल आयोगाकडे तांत्रिक बाबींची पूर्तता केली जाईल. त्यांनतर पारनेर, बिजोटे, कोटबेल, खिरमानी, नळकस, सारदे, वायगाव, सातमाणे पर्यंत नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मेरीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हरणबारी डाव्या कालव्यासाठी ५५ कोटी, तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्यासाठी १५ व केळझर चारी क्र मांक आठच्या कामासाठी ७ कोटी असा ७७ कोटी रु पयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या निधीमुळे प्रकल्प पूर्णत्वास येऊन ऐशी गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. चारी क्रमांक आठचे काम मुळाणे पर्यंत पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत भाक्षी ,चौगाव ,कऱ्हे व अजमिर सौंदाणे पर्यंत सहा किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुनदच्या सुळे डावा कालव्याचे ४७ किलोमीटर पर्यंत काम पूर्ण झाले असून हा कालवा आरम नदी पात्रापर्यंत पूर्ण करून ते पाणी आराई ,सटाणा, मोरेनगर, ठेंगोडा, दह्याने, पिंपळदर, मुंजवाड गावांसाठी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा कडे सादर करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.सह्याद्री अतिथी गृहावर रविवारी डॉ.भामरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. मोरे, उप अभियंता दिलीप काळे, डॉ. शेषराव पाटील, कृती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, अण्णा अहीरे, रवींद्र खैरनार, जिभाऊ कोर, क्र ांती येवला उपस्थित होते. (वार्ताहर)