शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

राज्यात नाशकात सर्वाधिक ७० बिबट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST

सह्याद्रीची पर्वतरांगा गोदावरी, दारणा, कादवासारख्या नद्यांचे प्रशस्त खोरे, उसाची बागायती शेती, गंगापूर, दारणा, वाघाडसारखी लहान-मोठी धरणे त्यांची कालवे राखीव ...

सह्याद्रीची पर्वतरांगा गोदावरी, दारणा, कादवासारख्या नद्यांचे प्रशस्त खोरे, उसाची बागायती शेती, गंगापूर, दारणा, वाघाडसारखी लहान-मोठी धरणे त्यांची कालवे राखीव वने यामुळे नाशिकला बिबट्यांचा अधिवासाकरिता पोषक असे भौगोलिक वातावरण आहे. यामुळे नाशिक पूर्व तालुक्यासह शहरालगतच्या खेड्यांमध्ये बिबट्यांचा वावर सातत्याने आढळून येतो. वन विभागाकडून ठिकठिकाणी दररोज पिंजरे तैनात केले जातात अन‌् बिबट्यांना दर दिवसाआड जेरबंद केले जाते. मागील वर्षाच्या तुलनेत ३९ बिबटे मृत्युमुखी पडले होते. यावर्षी यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

लॉकडाऊनपासून आतापर्यंत नाशिक पूर्व-पश्चिम विभागातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड, येवला, चांदवड, दिंडोरी आदी भागातून सुमारे वीसपेक्षा अधिक बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक डझनभर बिबटे गोदावरीच्या खोऱ्यात नाशिक वनपरिक्षेत्रातील तालुक्याच्या पूर्व भागांमधील गावांमध्ये जेरबंद झाले आहे. लॉकडाऊन काळात नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात बिबट-मानव संघर्षदेखील उद‌्भवला होता. यावेळी तिघा चिमुकल्यांसह एका वृध्दाचा बळी गेला होता. त्यानंतर इगतपुरी तालुक्यात महिनाभरापूर्वी दोघा बालिकांचा बिबट्याचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

--इन्फो--

बिबट्यांच्या मृत्यूबाबत सगळ्यांचे ‘मौन’

बिबटे वाढल्याचे बोलले जाते; मात्र बिबट्यांच्या मृत्यूबाबत फारशी चर्चा होत नाही. ज्याप्रमाणे नाशकात बिबटे मोठ्या संख्येने जेरबंद झालेत त्याचप्रमाणे बिबटे मृतावस्थेतदेखील मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे; मात्र हे वास्तव सहजासहजी मनुष्यप्राणी स्वीकारणार नाही. नाशकात यावर्षी सुमारे ७० बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये बहुतांश बिबट्यांना माणसानेच त्यांच्या भरधाव वाहनांखाली चिरडून टाकले तर काही बिबट्यांना उघड्या विहिरींमध्ये कोसळून जलसमाधी घ्यावी लागली, यालाही माणसांचेच दुर्लक्ष कारणीभूत ठरतेय.

---इन्फो--

नाशिकपाठोपाठ पुण्याचा क्रमांक

नाशिक वनवृत्तात अहमदनगरचाही समावेश होतो. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे मिळून सुमारे ७० बिबटे यावर्षी नोव्हेंबरपर्यंत मृत्युमुखी पडल्याचाी नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. त्यापाठोपाठ पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २६ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत तर कोल्हापूरमध्ये २६ आणि धुळ्यात १० बिबटे गतप्राण झाले. राज्यातील या शहरांमध्ये बिबटे मृत्यूची संख्या दोन आकडी आहेत, उर्वरित जिल्ह्यांत ती एक आकडी आहे.

----

फोटो आर वर १०फॉरेस्ट नावाने.