शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

आरटीई प्रवेशासाठी 13 एप्रिलपर्यंत मूदतवाढ आतापर्यंत 70 टक्के प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:00 IST

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रिये अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्यापैकी आतार्पयत सुमारे 70 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 89 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या प्रवेशाची संधी मिळूनही आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 13 एप्रिलपर्यंत ...

ठळक मुद्देआरटीई प्रवेशासाठी पुन्हा मूदतवाढ पहिल्या फेरीत आतापर्यंत 70 टक्के प्रवेश उर्वरित विद्यार्थ्यांसाठी 13 एप्रिलपर्यंत मूदत

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रिये अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्यापैकी आतार्पयत सुमारे 70 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 89 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या प्रवेशाची संधी मिळूनही आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 13 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या 3 हजार विद्याथ्र्यापैकी 2 हजार 89 विद्यार्थ्यांच्या पालकांनी 10 एप्रिलर्पयत त्यांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर उर्वरीत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ दिल्यामुळे आता संबंधित शाळांनाही 13 एप्रिलर्पयत प्रवेशाची सर्व प्रक्रि या पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीचा अहवाल शिक्षण प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींविषयी प्राप्त तक्रारींचे निराकरण केल्यानंतर दुसरी सोडत जाहीर केली जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी यावर्षी सर्वाधिक 10 हजार 416 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले असून, एका विद्यार्थ्यांची केवळ एकाच शाळेत लॉटरी जाहीर झाली आहे. त्यानुसार पहिल्या सोडतीत आतार्पयत 2 हजार 89 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, 13 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येईल. शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतवाढीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आली असून, पालकांना आरटीईच्या संकेतस्थळावर प्रवेशासाठीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोडतीत प्राप्त जागेवर प्रवेश अनिवार्यशिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीत लॉटरी लागलेल्या शाळेत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घेणो अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश घेतला नाही त्या पाल्यांचे प्रवेश पुढील सर्व फे:यांसाठी अपात्र ठरणार आहेत. शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील 6 हजार 589 जागांसाठी पहिल्या फेरीनंतर अजून दुसरी व तिसरी सोडत जाहीर केली जाणार आहे.