शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

गंगापूर धरणातून ७ हजार ७०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग; गोदावरीची वाढली पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 21:14 IST

मंगळवारी रात्रीपर्यंत शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाची हजेरी टप्प्याटप्प्याने सुरू होती. यामुळे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपासून बुधवारी (दि.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १९ मि.मी इतका पाऊस शहर व परिसरात पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली

ठळक मुद्देसंध्याकाळी सात वाजेपर्यंत ७ हजार ७४२ क्यूसेकवर विसर्ग पोहचला बुधवारी दिवसभर शहरासह गंगापूर धरण व समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली रात्री पावसाचा जोर वाढल्यास विसर्गामध्ये वाढ करण्यात येईलमंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपासून बुधवारी (दि.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १९ मि.मी इतका पाऊस

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाल्यामुळे अंबोली धरणातून गंगापूरमध्ये विसर्ग सुरू झाल्यानंतर गंगापूर धरणातून गोदावरी नदीत विसर्गाला प्रारंभ केला गेला. संध्याकाळपर्यंत ७ हजार ७०० क्यूसेक विसर्ग सुरू असल्याने गोदावरीचा जलस्तर उंचावला होता. यामुळे बुधवारचा आठवडे बाजारही रद्द झाला.मंगळवारी रात्रीपर्यंत शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाची हजेरी टप्प्याटप्प्याने सुरू होती. यामुळे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपासून बुधवारी (दि.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १९ मि.मी इतका पाऊस शहर व परिसरात पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली आहे; मात्र दिवसभरात पावसाने शहरात हजेरी लावली नाही. मंगळवारी रात्रीपर्यंत झालेला पाऊस आणि अंबोली धरणाच्या परिसरातील पावसामुळे गंगापूर धरणातून सुरू करण्यात आलेल्या विसर्गाने गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहचले होते. सर्वपित्री अमावस्या, बुधवारचा आठवडे बाजार असल्यामुळे गोदाघाटाच्या परिसरात सकाळपासून दिवसभर नागरिकांची गर्दी होती. गोदावरीच्या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे आठवडे बाजारावरही परिणाम झाला.

अंबोली धरण हाऊसफुल्ल झाल्यामुळे गंगापूर धरणात विसर्ग करण्यास प्रारंभ झाल्याने गंगापूर धरणसाठाही शंभर टक्क्यांवर पोहचल्यामुळे धरणातून सकाळी विसर्गाला सुरुवात झाली. सकाळी सहा वाजता दोन हजार दोनशे क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी विसर्ग साडेचार हजार क्यूसेकपर्यंत वाढला तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत ७ हजार ७४२ क्यूसेकवर विसर्ग पोहचला होता. धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे सोमेश्वरजवळील दूधसागर धबधब्याचेही पाणी वाढले होते. बुधवारी दिवसभर शहरासह गंगापूर धरण व समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती. रात्री पावसाचा जोर वाढल्यास विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल अथवा विसर्ग कमी केला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.