शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

बसमध्ये चढताना ७ विद्यार्थी पडले : चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 15:45 IST

पंचवटी : ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ७ विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१५) सकाळी पावणे सात वाजता घडली आहे. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसचालकाला मारहाण करून काहीकाळ बससेवा बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलिस ...

पंचवटी : ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ७ विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१५) सकाळी पावणे सात वाजता घडली आहे. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसचालकाला मारहाण करून काहीकाळ बससेवा बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलिस पथक दाखल झाल्यानंतर समझोता होऊन बससेवा पुर्ववत सुरू झाली.बसचालकाने बस थांब्यावर थांबविली नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान या प्रकारानंतर आडगाव परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आडगावमधुन नाशिकला नोकरी-शिक्षण कामधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा करणारे प्रवासी आहेत. पुर्वी या मार्गावर मुबलक बस होत्या, मात्र आर्थिक तोट्याचे कारण पुढे करुन नाशिक आगाराने बसफेºया कमी करण्यात आल्या आहेत. त्यातच मात्र बसचालक बस थांब्यावर बस न थांबविता पुढे नेऊन थांबवित आहेत. शुक्र वार (दि.१५) सकाळच्या सुमाराला काही महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी बस थांब्यावर थांबलेले असतांना ओझरकडून नाशिकला जाणारी बस आली मात्र ती बस थांब्यावर न थांबल्याने काही विद्यार्थी बसमागे धावत धावत्या बसमध्ये चढले तरी देखील चालकाने बस न थांबविल्याने अमोल पुरकर, बाळा जाधव या दोघा विद्यार्थ्यांसह ७ विद्यार्थी तोल जाऊन बसमधून खाली पडले. यात विद्यार्थ्यांच्या हाताला, पायाला व कमरेला किरकोळ मार लागला आहे.सकाळच्या सुमाराला आडगाव बसथांबा परिसरात ग्रामस्थांची वर्दळ असल्याने बसमधून विद्यार्थी पडल्याचे निदर्शनास येताच काही ग्रामस्थांनी त्या विद्यार्थ्यांना उचलले.त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बसचालकाला मारहाण करून आडगावातून जाणाºया सय्यद पिंप्री, सायखेडा, ओझर, विंचूर गवळी, मोहाडी या बस थांबवून अर्धा ते पाऊणतास बससेवा बंद पाडली.सदर घटनेनंतर एसटीचे अधिकारी व आडगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवासी, नागरिक यांच्याशी चर्चा करत आश्वासन दिल्याने वाद मिटला व बससेवा पुर्ववत सुरू झाली. आडगावातून नाशिकला जाणाºया बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी करूनही त्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.