शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

६४ कलेत वक्तृत्व कला महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:47 IST

वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्त्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ, असे संबोधतो. भगवान श्रीकृष्णांनीदेखील अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करताना त्यास आपल्या वक्तृत्वातून दिशादर्शन केले

नाशिक : वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्त्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ, असे संबोधतो. भगवान श्रीकृष्णांनीदेखील अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करताना त्यास आपल्या वक्तृत्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्त्व त्यांनी पटवून दिल्यामुळे आपल्या भारतातील ६४ कलांमध्ये वक्तृत्व कलेला महत्त्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.रावसाहेब थोरात सभागृहात तेराव्या ‘मविप्र करंडक’ अखिल भारतीय वक्तृृत्व स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि. २१) झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते यांच्यासह चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, डॉ. प्रशांत देवरे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, प्रा. नानासाहेब दाते, गुलाब भामरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एन. एस. पाटील, प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये वक्त्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच श्रोत्यालाही असल्याचे नीलिमा पवार यांनी नमूद केले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व वक्तृृत्व कलेतही त्यांनी प्रगती करावी, या दृष्टिकोनातून डॉ. वसंत पवार यांनी मविप्र करंडक स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवल्याचे माणिकराव बोरस्ते यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त करताना सांगितले. प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख डॉ. डी. पी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील यांनी केले. उपप्राचार्य डॉ. एम. बी. मत्सागर यांनी आभार मानले.मविप्र करंडकचे विषयमविप्र करंडक वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : नवी दिशा’, ‘महात्मा गांधी : जागतिक परिप्रेक्ष्य’, ‘चला जलचिंतन करूया’, ‘जगावं की मरावं, हाच प्रश्न आहे’, ‘कहते है कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और है!’ हे विषय आहेत. या विषयांवर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून स्पर्धेत सहभागी झालेले १५० स्पर्धक आपले विचार व्यक्त करणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक