शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

महिलांमध्ये गर्भाशय, स्तन कॅन्सरचे प्रमाण ६२ टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:20 IST

नाशिक : देशात कॅन्सरचा प्रसार अत्यंत वेगाने होत असताना विशेषत्वे महिलांमध्येदेखील कॅन्सरचे प्रमाण हे पुरुषांच्या बरोबरीला पोहोचू लागले ...

नाशिक : देशात कॅन्सरचा प्रसार अत्यंत वेगाने होत असताना विशेषत्वे महिलांमध्येदेखील कॅन्सरचे प्रमाण हे पुरुषांच्या बरोबरीला पोहोचू लागले आहे. देशातील १०० कॅन्सरबाधित महिलांपैकी ६२ टक्के प्रमाण हे स्तन कॅन्सर आणि गर्भाशय कॅन्सरचे असून हे दोन्ही कॅन्सर लवकर लक्षात आल्यास ते बरे होण्याचे प्रमाण १०० टक्के असू शकते. मात्र, या संभाव्य आजारांबाबत चर्चा करतानाही महिला खुलेपणाने कुटुंबियांनाही सांगत नसल्याने महिलांमधील कॅन्सर आणि त्यामुळे घडणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

देशातील बहुतांश महिला कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देताना त्यांच्या स्वत:च्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. त्यामुळेच लक्षणे समजत असूनही तपासणी केली जाण्याचे टाळले जाते. त्यामुळेच महिलांना होणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी ३२ टक्के महिलांना स्तनांच्या कॅन्सर तर ३० टक्के महिलांना गर्भाशय कॅन्सर निष्पन्न होत असल्याचे वैद्यकीय सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशात स्तनाच्या कॅन्सरविषयी जनजागृतीचे प्रमाण खुपच कमी आहे. जननसंस्थेचे आजार, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदींबाबत महिला खुलेपणाने पतीशीदेखील बोलत नाहीत, त्यामुळे त्या कॅन्सरला आळा घालण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. स्तनाच्या कॅन्सरचे निदान लवकर अर्थात पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात झाल्यास पेशंट पूर्णपणे बरे होण्याची शक्यता १०० टक्के असते. आपल्याला स्तनांचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो, अशी भीती एक तृतीयांश महिलांना वाटते, मात्र त्याबाबत चाचणी करण्यात होणारी टाळाटाळच घातकी ठरत असल्याने महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चाचण्यांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

इन्फो

डॉ. आनंदीबाई स्मरणार्थ महिला आरोग्य दिन

१८६५ मध्ये जन्मलेल्या आनंदी यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाला होता. त्याकाळी विदेशात जाऊन आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील आणि भारतातीलही पहिल्या महिला डॉक्टर बनल्या. डॉ.आनंदीबाई जोशी यांचे कार्य प्रेरणादायी ठरावे, म्हणून भारतात दरवर्षी २६ फेब्रुवारी या त्यांच्या स्मृतीदिनाला राष्ट्रीय महिला आरोग्य दिन पाळला जाताे.

कोट

महिलांमध्ये गर्भाशय आणि स्तन कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असून त्यांची वेळीच चाचणी करुन घेतल्यास कॅन्सरग्रस्त महिला पूर्ण बरे होण्याचे प्रमाण १०० टक्के होऊ शकते. त्यामुळेच संबंधित अवयवांमधील थोडाही बदल लक्षात आल्यास महिलांनी त्यांच्या चाचण्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

डॉ. राज नगरकर, कॅन्सर तज्ज्ञ

लोगो

महिला आरोग्य दिन विशेष

फोट

२५कॅन्सर