शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

महिलांमध्ये गर्भाशय, स्तन कॅन्सरचे प्रमाण ६२ टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:20 IST

नाशिक : देशात कॅन्सरचा प्रसार अत्यंत वेगाने होत असताना विशेषत्वे महिलांमध्येदेखील कॅन्सरचे प्रमाण हे पुरुषांच्या बरोबरीला पोहोचू लागले ...

नाशिक : देशात कॅन्सरचा प्रसार अत्यंत वेगाने होत असताना विशेषत्वे महिलांमध्येदेखील कॅन्सरचे प्रमाण हे पुरुषांच्या बरोबरीला पोहोचू लागले आहे. देशातील १०० कॅन्सरबाधित महिलांपैकी ६२ टक्के प्रमाण हे स्तन कॅन्सर आणि गर्भाशय कॅन्सरचे असून हे दोन्ही कॅन्सर लवकर लक्षात आल्यास ते बरे होण्याचे प्रमाण १०० टक्के असू शकते. मात्र, या संभाव्य आजारांबाबत चर्चा करतानाही महिला खुलेपणाने कुटुंबियांनाही सांगत नसल्याने महिलांमधील कॅन्सर आणि त्यामुळे घडणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

देशातील बहुतांश महिला कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देताना त्यांच्या स्वत:च्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. त्यामुळेच लक्षणे समजत असूनही तपासणी केली जाण्याचे टाळले जाते. त्यामुळेच महिलांना होणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी ३२ टक्के महिलांना स्तनांच्या कॅन्सर तर ३० टक्के महिलांना गर्भाशय कॅन्सर निष्पन्न होत असल्याचे वैद्यकीय सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशात स्तनाच्या कॅन्सरविषयी जनजागृतीचे प्रमाण खुपच कमी आहे. जननसंस्थेचे आजार, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदींबाबत महिला खुलेपणाने पतीशीदेखील बोलत नाहीत, त्यामुळे त्या कॅन्सरला आळा घालण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. स्तनाच्या कॅन्सरचे निदान लवकर अर्थात पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात झाल्यास पेशंट पूर्णपणे बरे होण्याची शक्यता १०० टक्के असते. आपल्याला स्तनांचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो, अशी भीती एक तृतीयांश महिलांना वाटते, मात्र त्याबाबत चाचणी करण्यात होणारी टाळाटाळच घातकी ठरत असल्याने महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चाचण्यांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

इन्फो

डॉ. आनंदीबाई स्मरणार्थ महिला आरोग्य दिन

१८६५ मध्ये जन्मलेल्या आनंदी यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाला होता. त्याकाळी विदेशात जाऊन आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील आणि भारतातीलही पहिल्या महिला डॉक्टर बनल्या. डॉ.आनंदीबाई जोशी यांचे कार्य प्रेरणादायी ठरावे, म्हणून भारतात दरवर्षी २६ फेब्रुवारी या त्यांच्या स्मृतीदिनाला राष्ट्रीय महिला आरोग्य दिन पाळला जाताे.

कोट

महिलांमध्ये गर्भाशय आणि स्तन कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असून त्यांची वेळीच चाचणी करुन घेतल्यास कॅन्सरग्रस्त महिला पूर्ण बरे होण्याचे प्रमाण १०० टक्के होऊ शकते. त्यामुळेच संबंधित अवयवांमधील थोडाही बदल लक्षात आल्यास महिलांनी त्यांच्या चाचण्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

डॉ. राज नगरकर, कॅन्सर तज्ज्ञ

लोगो

महिला आरोग्य दिन विशेष

फोट

२५कॅन्सर