शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

६२ टक्के बसेस अद्यापही आगारातच; ग्रामीण भागाला पिकअपचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाला शंभर टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली ...

नाशिक : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाला शंभर टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी जिल्ह्यातील बसेस अजूनही पूर्णपणे सुरू होऊ शकलेल्या नाहीत. प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याचे कारण आहेच, शिवाय खर्च कमी करण्याचा प्रयत्न म्हणूनदेखील अनेक बसेस आगारातच उभ्या करण्यात आलेल्या आहेत.

यावर्षी बसेस रुळावर येत असतानाच लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यामुळे अत्यावश्यक सेवावगळता इतर प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण एप्रिल-मे महिन्यात महामंडळाच्या बसेस उभ्या होत्या. जून महिन्यात निर्बंध कमी झाल्याने शंभर टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली; मात्र कोरोनामुळे बसेसमधून प्रवास करण्याबाबत नागरिकांमध्ये काहीशी साशंकता असल्याने बसेसला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. ग्रामीण भागातून अजूनही पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे.

--इन्फो--

या गावांना बस कधी सुरू होणार?

१) ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याने या प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

२) बागलाण, सुरगाणा, हरसूल, सय्यदपिंप्री, सायखेडा या गावांकडील बसेस बंद आहेत.

३) तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या सध्या मागणीनुसार सोडल्या जात आहेत.

४) नाशिक-१ आगारातून जिल्ह्याच्या बसेस बंद असून, बाहेरगावच्या बसेस चालविल्या जात आहेत.

--इन्फो--

एकूण बसेस : ६६०

सध्या सुरू असलेल्या बसेस : ४६०

आगारात उभ्या बसेस : २००

एकूण कर्मचारी : ४५००

चालक : २१००

वाहक : १९००

सध्या कामावर चालक : ९२०

सध्या कामावर वाहक ९२०

--इन्फो--

प्रवाशांचा खासगी गाड्यांचा आधार

१) ग्रामीण भागात प्रवासी बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. गंगापूर-गिरणारे, हरसूल या मार्गावर बसेस नसल्याने प्रवाशांना पिकअप जीप तसेच रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.

२) ओझर, त्र्यंबकेश्वर, सिन्नर यामार्गावरदेखील पिकअप जीप भरून प्रवासी वाहतूक केली जात आहे. भगूरला जाणाऱ्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.

३) वणी, दिंडोरी, पेठ मार्गावरील बसेस कमी असल्याने प्रवाशांना जीपने प्रवास करावा लागत आहे.

--कोट--

काय म्हणतात प्रवास करणारे

ग्रामीण भागातील बसेस अजूनही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. कधी कोणती बस सुरू होते आणि बंद केली जाते हेच कळत नसल्याने बसची वाट न पाहाता मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. हरसूल ते नाशिक जीपने प्रवास करावा लागला. परतीसाठी तीच जीप असेल तर नाशिकला यावे लागते. बस नसल्याने जीपवरच अवलंबून आहे.

- बापू मोडवे, प्रवासी

त्र्यंबकेश्वरला जायचे तरी बसची वाट पहावी लागते. दर तासाला बस असल्याचे कंट्रोलकडून सांगण्यात आले; मात्र दोन तास झाले बसच उभी नाही.

बस सोडली जाणार आहे की नाही याविषयी कुणालाही माहिती नाही. या मार्गावर खासगी वाहने कमी असल्याने प्रवास करणे कठीण होते. जिल्ह्यात कोठेही जायचे असले तरी परतीला बस मिळेलच हे सांगता येत नाही.

- अर्जुन खताळ, प्रवासी