शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

६२ टक्के बसेस अद्यापही आगारातच; ग्रामीण भागाला पिकअपचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाला शंभर टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली ...

नाशिक : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाला शंभर टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी जिल्ह्यातील बसेस अजूनही पूर्णपणे सुरू होऊ शकलेल्या नाहीत. प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याचे कारण आहेच, शिवाय खर्च कमी करण्याचा प्रयत्न म्हणूनदेखील अनेक बसेस आगारातच उभ्या करण्यात आलेल्या आहेत.

यावर्षी बसेस रुळावर येत असतानाच लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यामुळे अत्यावश्यक सेवावगळता इतर प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण एप्रिल-मे महिन्यात महामंडळाच्या बसेस उभ्या होत्या. जून महिन्यात निर्बंध कमी झाल्याने शंभर टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली; मात्र कोरोनामुळे बसेसमधून प्रवास करण्याबाबत नागरिकांमध्ये काहीशी साशंकता असल्याने बसेसला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. ग्रामीण भागातून अजूनही पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे.

--इन्फो--

या गावांना बस कधी सुरू होणार?

१) ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याने या प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

२) बागलाण, सुरगाणा, हरसूल, सय्यदपिंप्री, सायखेडा या गावांकडील बसेस बंद आहेत.

३) तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या सध्या मागणीनुसार सोडल्या जात आहेत.

४) नाशिक-१ आगारातून जिल्ह्याच्या बसेस बंद असून, बाहेरगावच्या बसेस चालविल्या जात आहेत.

--इन्फो--

एकूण बसेस : ६६०

सध्या सुरू असलेल्या बसेस : ४६०

आगारात उभ्या बसेस : २००

एकूण कर्मचारी : ४५००

चालक : २१००

वाहक : १९००

सध्या कामावर चालक : ९२०

सध्या कामावर वाहक ९२०

--इन्फो--

प्रवाशांचा खासगी गाड्यांचा आधार

१) ग्रामीण भागात प्रवासी बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. गंगापूर-गिरणारे, हरसूल या मार्गावर बसेस नसल्याने प्रवाशांना पिकअप जीप तसेच रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.

२) ओझर, त्र्यंबकेश्वर, सिन्नर यामार्गावरदेखील पिकअप जीप भरून प्रवासी वाहतूक केली जात आहे. भगूरला जाणाऱ्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.

३) वणी, दिंडोरी, पेठ मार्गावरील बसेस कमी असल्याने प्रवाशांना जीपने प्रवास करावा लागत आहे.

--कोट--

काय म्हणतात प्रवास करणारे

ग्रामीण भागातील बसेस अजूनही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. कधी कोणती बस सुरू होते आणि बंद केली जाते हेच कळत नसल्याने बसची वाट न पाहाता मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. हरसूल ते नाशिक जीपने प्रवास करावा लागला. परतीसाठी तीच जीप असेल तर नाशिकला यावे लागते. बस नसल्याने जीपवरच अवलंबून आहे.

- बापू मोडवे, प्रवासी

त्र्यंबकेश्वरला जायचे तरी बसची वाट पहावी लागते. दर तासाला बस असल्याचे कंट्रोलकडून सांगण्यात आले; मात्र दोन तास झाले बसच उभी नाही.

बस सोडली जाणार आहे की नाही याविषयी कुणालाही माहिती नाही. या मार्गावर खासगी वाहने कमी असल्याने प्रवास करणे कठीण होते. जिल्ह्यात कोठेही जायचे असले तरी परतीला बस मिळेलच हे सांगता येत नाही.

- अर्जुन खताळ, प्रवासी