शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

जिल्ह्यात खरिपाची ६१ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:53 IST

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर मान्सूनच्या पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, जिल्ह्यात सुमारे ६१.३१ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती नाशिक जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर मान्सूनच्या पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, जिल्ह्यात सुमारे ६१.३१ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती नाशिक जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.मान्सूनच्या पूर्वार्धात जून महिन्यातील शेवटचे दोन आठवडे कोरडे गेल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु जुलैच्या दुसºया आठवड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने खरिपाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, जिल्ह्णातील सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत ४ लाख ६५ हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. यात २६.२३ टक्के भात, ७.४१ टक्के ज्वारी, ६१.११ टक्के बाजरी, ५.३४ टक्के नागली, ९८.५८ टक्के मका व २१.५१ अन्य तृणधान्यांसह एकूण ६४.२६ टक्के तृण धान्याची पेरणी पूर्ण झाली आहे.तर कडधान्य पिकांमध्ये ४६.५५ टक्के तूर, ४६.७२ टक्के उडीद, १०६.३७ मूग व २९.७ टक्के अन्य कडधान्यांसह ५६.३९ टक्के कडधान्य पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. गळीत धान्य प्रकारात भुईमूग ४८.२९ टक्के, सूर्यफूल २.०३ टक्के, सोयाबीन ४७.६ टक्के, खुरासणी ९.१६ टक्के व ४.७० टक्के गळीत धान्यांसह एकूण ४०.७७ टक्के गळीत धान्यांची पेरणी पूर्ण झाली आहे.३ लाख हेक्टरवर अन्नधान्य : ६४.२६ टक्के तृणधान्य, तर ५६.३९ टक्के कडधान्याचे पीक.कापसाची ८४ टक्के लागवड पूर्णनाशिक जिल्ह्यात कापूस लागवडीचे ४७ हजार २१६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी ३९ हजार ७०९ हेक्टर म्हणजे सुमारे ८४.९ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ४ लाख ५२ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य पीक घेतले जाते. त्यापैकी २ लाख ९१ हजार १०६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, ४५ हजार ६७७ हेक्टरपैकी २२ हजार ७५५ हेक्टरवर कडधान्याची पेरणी झाली आहे. यात एकूण ४ लाख ९८ हजार ६५६ हेक्टरपैकी ३ लाख १६ हजार ८६१ हेक्टर क्षेत्रावर अन्नधान्य पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती