शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन परतीच्या नोटिसीला ६००० करदात्यांचा ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:12 IST

नाशिक : शेतकऱ्यांना निर्माण होणारी आर्थिक अडचण दूर व्हावी, त्यांना दिलासा मिळावा यासाठी पंतप्रधान किसान पेन्शन योजना राबविली ...

नाशिक : शेतकऱ्यांना निर्माण होणारी आर्थिक अडचण दूर व्हावी, त्यांना दिलासा मिळावा यासाठी पंतप्रधान किसान पेन्शन योजना राबविली जाते. शेतकऱ्यांना सन्मान देणारी ही पेन्शन योजना असली तरी कोणत्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल याविषयीचे निकष तयार करण्यात आलेले आहेत. परंतु असे निकष टाळून अनेक शेतकऱ्यांनी या याेजनेत नाव नोंदविल्याने अशा शेतकऱ्यांकडून आता वसुली सुरू करण्यात आली आहे. यामध्ये करदाते शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

जे शेतकरी आयकर भरत असतील किंवा शासकीय सेवेत असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. जो शेतकरी शेती करतो, परंतु शेत त्याच्या नावावर नाही तर त्याच्या वडिलांच्या, आजोबांच्या नावावर असेल तर अशाही शेतकऱ्याला लाभ दिला जात नाही. दुसऱ्याची शेती कसत असेल तर असा शेतकरीसुद्धा योजनेसाठी पात्र नाही. डॉक्टर्स, इंजिनीअर, सीए, वकील आदी व्यावसायिक असलेल्या शेतकऱ्यांनादेखील योजनेचा लाभ दिला जात नाही. असे सर्व निकष असले तरी अनेकांनी येाजनेत नावे नोंदविली. यामध्ये सर्वाधिक शेतकरी हे आयकर भरणारे आहेत.

अशा शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी त्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यातील काही शेतकऱ्यांनी योजनेचे घेतलेेले पैसे परत केले असले तरी अद्यापही सुमारे ६५५० शेतकऱ्यांनी घेतलेले पैसे पुन्हा भरलेले नाहीत.

--इन्फो--

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान पेन्शन योजनेचे लाभार्थी

४८७५५७

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी

६०७६

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी

१२६२९

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी

६५५०

--इन्फो--

आतापर्यंत ६१ लाख झाले वसूल

१) शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची पेन्शन तर तीन महा याप्रमाणे जमा केली जाते. यामध्ये अनेक अपात्र शेतकऱ्यांचादेखील समावेश आहे. आतापर्यंत अशा ६१,६७,०००० इतक्या शेतकऱ्यांकडून रक्कम जमा करण्यात आलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.

२) पीएम किसान योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी करदाते शेतकऱ्यांची संख्या मोठी असून त्यांची माहिती एकत्रित करून त्यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. एकूण नोटीस पाठविलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही १२,६२९ इतकी असून त्यातील ४० टक्के शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा पाठविण्याची वेळ आलेली आहे.

३) काही अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन ते तीनपेक्षा अधिक हप्तेदेखील जमा झाल्याची बाब उघड झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार नोटीस पाठविली जात आहे. पहिली वसुली झाल्यानंतरही अनेकांच्या खात्यावर दुसरी रक्कमही जमा झालेली आहे.

--इन्फो--

काही शेतकरी अजूनही लाभावाचून वंचित

दर तीन महिन्यांनी दोन हजार याप्रमाणे शेतकऱ्यांना पेन्शन देणारी ही योजना आहे. यातील पात्र-अपात्रतेबाबतचा घोळ कायम असताना जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नसल्याच्यादेखील तक्रारी अनेकदा समोर आलेल्या आहेत. सर्व निकष पूर्ण करीत असतानाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नसल्याचे सांगण्यात येते. बँकांमध्ये गेल्यानंतर पैसे जमाच झाले नसल्याचे सांगितले जाते. काही शेतकऱ्यांना केवळ पहिला हप्ता मिळतो, तर नंतरच्या दोन हप्त्यांसाठी प्रतीक्षा करावी लागते. काहींना तीनही हप्ते मिळतात, तर काहींना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागते. पेन्शन योजनेतील या घोळात अनेक उशिरा जमा होणाऱ्या निधीमुळेदेखील गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.