शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

रिंगरोडची ६० टक्के कामे अद्याप अपूर्ण

By admin | Updated: October 30, 2014 23:34 IST

अनेक अडथळे : अधिकाऱ्यांना पुन्हा ‘अच्छे दिन’ची अपेक्षा

नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाजत गाजत सुरू केलेल्या रिंगरोडच्या कामांना ब्रेक बसला आहे. अपुरा निधी आणि वृक्षप्रेमींचा विरोध यामुळे ही कामे आत्तापर्यंत जेमतेम ४० टक्के इतकीच पूर्ण झाली आहेत. आता राज्यात नवीन सरकार आल्यानंतर निधीचा प्रश्न सुटेल आणि त्यानंतर या कामांना गती मिळेल, अशी आस आता प्रशासन बाळगून आहे.आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अंतर्गत वळण मार्ग आणि बाह्य वळण मार्ग साकारले जात आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्यात दर्शविलेले रिंगरोड तयार करण्यासाठी पालिकेला तब्बल २२ वर्षे लागली आहेत. ४६५ कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ही कामे त्वरित पूर्ण होतील असे सांगितले जात होते. शिवाय एका मार्गावरून शहराबाहेर पडण्यासाठी अवघ्या १५ मिनिटांचा कालावधी लागेल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र हे रस्ते कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.सदरचे अनेक रस्ते तयार करताना मुळातच भूसंपादनास अडथळे आले. त्यामुळे जनार्दनस्वामी मठामागील बाजू तसेच उंटवाडी ते सपना थिएटर तसेच जेहान सर्कल ते गंगापूर गाव अशा अनेक ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर दिंडोरीरोड, गंगापूररोडसारख्या ठिकाणी वृक्षतोडीस नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने हरकतींच्या सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय वृक्षतोडीस मज्जाव केला आहे. महत्त्वाचे म्हणजे निधीची चणचण हा गंभीर प्रश्न आहे. पालिकेकडे कोट्यवधी रुपयांची देयके थकल्याने रिंगरोडच्या कामांना गती मिळालेली नाही. दिवाळीत काही प्रमाणात ठेकेदारांना देयके मिळाली असली, तरी आता मुख्यत्वे केंद्र आणि राज्य शासनाकडून निधीची अपेक्षा आहे. केंद्राप्रमाणे राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर आता केंद्र शासन निधीचा विषय हाती घेईल असे सांगण्यात येत असून, त्यामुळे पालिकेला ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)