शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बोंडअळीने ६० टक्के कापूस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:53 IST

नाशिक : विदर्भापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही कापूस पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने कापसाच्या उत्पादनावर सुमारे ६० टक्के परिणाम झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी खात्याने केलेल्या पीक पंचनाम्याच्या अहवालानुसार सुमारे २५ हजार हेक्टरवरील पीक बोंडअळीने नष्ट केले

ठळक मुद्देमालेगाव, येवला, नांदगावला फटका २५ हजार हेक्टर बाधित

नाशिक : विदर्भापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही कापूस पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने कापसाच्या उत्पादनावर सुमारे ६० टक्के परिणाम झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी खात्याने केलेल्या पीक पंचनाम्याच्या अहवालानुसार सुमारे २५ हजार हेक्टरवरील पीक बोंडअळीने नष्ट केलेअसून, त्याचा फटका मालेगाव, येवला व नांदगाव तालुक्यातील शेतकºयांना सर्वाधिक बसला आहे. (पान २ वर)दीड महिन्यापूर्वी बीटी कॉटनवर फवारणी करण्यासाठी वापरल्या जाणाºया काही कंपन्यांच्या सदोष औषधामुळे बोंडअळीचा झपाट्याने प्रादुर्भाव झाला आहे. प्रारंभी विदर्भापुरताच हा प्रश्न मर्यादित असल्याचे मानले जात होते. तथापि, डिसेंबरमध्ये जिल्ह्णात काढणीला आलेल्या कापसावरही त्याचा परिणाम दिसू लागल्याने अनेक शेतकºयांनी बोंडअळीचा अन्यत्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाचे पीकच उखडून नष्ट केले तर काहींना त्यावरही औषध फवारणी करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टीचा विचार करता शासनाने अखेर बोंडअळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले. नाशिक जिल्ह्णात प्रामुख्याने मालेगाव, येवला, नांदगाव, देवळा, सटाणा, निफाड, चांदवड व सिन्नर या तालुक्यात कमी- अधिक प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. साधारणत: ४६३२० हेक्टर क्षेत्र कपाशीचे असून, त्यातील बोंडअळीमुळे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान २५३५६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे झाले आहे. म्हणजेच लागवड केलेल्या क्षेत्रापैकी ६० टक्के पीक शेतकºयांच्या हातातून गेले असल्याने यंदा कपाशीचे उत्पन्न कमालीचे घटणार आहे. कृषी खात्याने प्राथमिक पातळीवर सदरचे पंचनामे केले असून, अंतिम नुकसान निश्चिती करण्यास अवधी असला तरी, सर्वाधिक फटका मालेगाव, येवला व नांदगाव तालुक्याला बसला आहे.पंचनामे बाकीनांदगाव तालुक्यात बोंडअळीने शिरकाव करताच तेथील शेतकºयांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीची झाडे उपटून टाकली आहेत. त्यामुळे शेतात कापूस दिसत नसल्याने त्यांचे पंचनामे करण्यात कृषी खात्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदगाव तालुक्यात फक्त ३१ टक्के व बागलाणमध्ये ६३ टक्के पंचनामे होऊ शकले आहेत. हे पंचनामे झाल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.