शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
4
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
5
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
6
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
7
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
8
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
9
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
10
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
11
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
12
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
13
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
14
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
15
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
16
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
17
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
18
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
19
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
20
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक

अंत्योदय योजनेच्या धान्यात ६० किलो कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:56 IST

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत योजनेचा लाभ घेणाºया व अंत्योदय योजनेत समावेश असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींची योजनेतील शिधापत्रिका रद्द करून त्यांना प्राधान्य कुटुंबासाठी असलेल्या शिधापत्रिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत योजनेचा लाभ घेणाºया व अंत्योदय योजनेत समावेश असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींची योजनेतील शिधापत्रिका रद्द करून त्यांना प्राधान्य कुटुंबासाठी असलेल्या शिधापत्रिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेत एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न गटातील व्यक्तींना पांढरी शिधापत्रिका दिली जाते. लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना केशरी शिधापत्रिका देण्यात आली आहे. वार्षिक बारा ते २५ हजार रुपये उत्पन्न असलेल्यांना अंत्योदय वा पिवळी शिधापत्रिका देण्यात येते. अंत्योदय योजनेचे लाभार्थी होण्यासाठी ग्रामसभेचा ठराव व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या सर्व्हेत समावेश आवश्यक आहे. अशा योजनेच्या लाभार्थींना प्रतिमाणसी २१ किलो गहू व १४ किलो तांदूळ असे महिन्याकाठी ३५ किलो धान्य दोन व तीन रुपये किलो दराने रेशनमधून उपलब्ध होते. एका शिधापत्रिकेत दोन व्यक्ती असल्यास त्यांना महिन्याकाठी ७० किलो धान्य देण्याची तरतूद आहे. अन्नसुरक्षा कायद्यान्वये प्रतिमानसी महिन्याला पाच किलो धान्य देण्याची तरतूद आहे. शिधापत्रिकेवर कितीही व्यक्ती असतील तरी अधिकाधिक ३५ किलो धान्य देण्याची या कायद्यात तरतूद आहे.महिन्याकाठी जादा धान्य अंत्योदय योजनेतील एक किंवा दोन लाभार्थी असलेल्या व्यक्तींवर दरमहा कमीत कमी ३५ व जास्तीत जास्त ७० किलो धान्य दिले जात असल्याने शासनाच्या मते दोन व्यक्तींसाठी ७० किलो धान्य महिन्याकाठी जादा होत आहे. या योजनेतील व्यक्तींकडून धान्याचा वापर होऊ शकत नाही त्यामुळे ते रेशनमधून खरेदी करीत नसावेत. त्यामुळे या पत्रिका रद्द करून त्यांना अन्नसुरक्षा कायद्यान्वये शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून त्यांना महिन्याकाठी पाच व जास्तीत जास्त दहा किलोच धान्य मिळणार आहे. यातून शासनाची बचत होणार आहे.जिल्ह्यात ३५ हजार कुटुंबाना फटकाअंत्योदय योजनेत समावेश असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींचे प्राधान्य कुटुंबात स्थलांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्णातील ३५ हजार ३६९ शिधापत्रिकाधारकांना फटका बसणार आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या एक व्यक्तीची संख्या १५६९० इतकी असून, दोन व्यक्तींची संख्या १९,६८९ इतकी आहे. आॅक्टोबर महिन्यापासून या सर्वांना दरमहा पाच किंवा दहा किलो धान्य रेशन दुकानातून स्वस्त दरात मिळणार आहे.