शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

अंत्योदय योजनेच्या धान्यात ६० किलो कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:56 IST

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत योजनेचा लाभ घेणाºया व अंत्योदय योजनेत समावेश असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींची योजनेतील शिधापत्रिका रद्द करून त्यांना प्राधान्य कुटुंबासाठी असलेल्या शिधापत्रिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत योजनेचा लाभ घेणाºया व अंत्योदय योजनेत समावेश असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींची योजनेतील शिधापत्रिका रद्द करून त्यांना प्राधान्य कुटुंबासाठी असलेल्या शिधापत्रिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेत एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न गटातील व्यक्तींना पांढरी शिधापत्रिका दिली जाते. लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना केशरी शिधापत्रिका देण्यात आली आहे. वार्षिक बारा ते २५ हजार रुपये उत्पन्न असलेल्यांना अंत्योदय वा पिवळी शिधापत्रिका देण्यात येते. अंत्योदय योजनेचे लाभार्थी होण्यासाठी ग्रामसभेचा ठराव व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या सर्व्हेत समावेश आवश्यक आहे. अशा योजनेच्या लाभार्थींना प्रतिमाणसी २१ किलो गहू व १४ किलो तांदूळ असे महिन्याकाठी ३५ किलो धान्य दोन व तीन रुपये किलो दराने रेशनमधून उपलब्ध होते. एका शिधापत्रिकेत दोन व्यक्ती असल्यास त्यांना महिन्याकाठी ७० किलो धान्य देण्याची तरतूद आहे. अन्नसुरक्षा कायद्यान्वये प्रतिमानसी महिन्याला पाच किलो धान्य देण्याची तरतूद आहे. शिधापत्रिकेवर कितीही व्यक्ती असतील तरी अधिकाधिक ३५ किलो धान्य देण्याची या कायद्यात तरतूद आहे.महिन्याकाठी जादा धान्य अंत्योदय योजनेतील एक किंवा दोन लाभार्थी असलेल्या व्यक्तींवर दरमहा कमीत कमी ३५ व जास्तीत जास्त ७० किलो धान्य दिले जात असल्याने शासनाच्या मते दोन व्यक्तींसाठी ७० किलो धान्य महिन्याकाठी जादा होत आहे. या योजनेतील व्यक्तींकडून धान्याचा वापर होऊ शकत नाही त्यामुळे ते रेशनमधून खरेदी करीत नसावेत. त्यामुळे या पत्रिका रद्द करून त्यांना अन्नसुरक्षा कायद्यान्वये शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून त्यांना महिन्याकाठी पाच व जास्तीत जास्त दहा किलोच धान्य मिळणार आहे. यातून शासनाची बचत होणार आहे.जिल्ह्यात ३५ हजार कुटुंबाना फटकाअंत्योदय योजनेत समावेश असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींचे प्राधान्य कुटुंबात स्थलांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्णातील ३५ हजार ३६९ शिधापत्रिकाधारकांना फटका बसणार आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या एक व्यक्तीची संख्या १५६९० इतकी असून, दोन व्यक्तींची संख्या १९,६८९ इतकी आहे. आॅक्टोबर महिन्यापासून या सर्वांना दरमहा पाच किंवा दहा किलो धान्य रेशन दुकानातून स्वस्त दरात मिळणार आहे.