शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

५९ ग्रामपंचायती प्रशासकाच्या हाती जाणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:09 IST

नांदगाव : राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपत असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील जूनमध्ये राज्यातील मुदत संपलेल्या १९ जिल्ह्यातील १५६६ ग्रामपंचायतीत शहरातून कामकाज पाहणारे प्रशासक नको, असा सूर आळविला जात असताना आता नव्याने १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची जबाबदारी कुणावर सोपविणार हा प्रश्न आहे.

नांदगाव : राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपत असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील जूनमध्ये राज्यातील मुदत संपलेल्या १९ जिल्ह्यातील १५६६ ग्रामपंचायतीत शहरातून कामकाज पाहणारे प्रशासक नको, असा सूर आळविला जात असताना आता नव्याने १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची जबाबदारी कुणावर सोपविणार हा प्रश्न आहे.नांदगाव तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींवर जुलै संपताच प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. ग्रामपंचायतीची मुदत आॅगस्टमध्ये संपत असून, यात वडाळी खुर्द, मांडवड, आझादनगर, तांदूळवाडी, मोरझर, माळेगाव (क.), नारायणगाव, घाडगेवाडी, अनकवाडे, सटाणा, कºही, सावरगाव, आमोदे, रोहिले बु,. जळगाव खु., चिंचविहीर, रणखेडा, भालूर, पोखरी, गंगाधरी, भौरी, वंजारवाडी, वाखारी, पिंप्राळे, न्यायडोंगरी, साकोरे, अस्वलदरा बाभूळवाडी, डॉक्टरवाडी, बोलठाण, जवळकी, कुसुमतेल, पिंप्री हवेली, परधाडी, चांदोरा, वडाळी बु., हिसवळ खु. बेजगाव, दहेगाव, बाणगाव खु., एकवई, धोटाणे बु., नांदूर, पारेकरवाडी, कळमदरी, जातेगाव, हिंगणेदेहरे, सोयगाव, मोहेगाव, टाकळी बु., खिर्डी, पानेवाडी, पांझणदेव, अस्तगाव, कोंढार, नवे पांझण, बिरोळे, वेहेळगाव, माणिकपुंज, कासारी या ग्रामपंचायतीची मुदत ६ ते १६ आॅगस्टपर्यंत संपत असल्याने जुलैअखेरपर्यंत येथे प्रशासक नियुक्ती केली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने येथे प्रशासकाच्या हाती कारभार दिला जाणार आहे.मालेगाव तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींचा समावेशमालेगाव : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट लागू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या प्रक्रियेमुळे गावपातळीवरील राजकारण ऐन पावसाळ्यात तापू लागले आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्टमध्ये संपत आहे, मात्र राज्यात कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक बसविण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी गाव पुढाऱ्यांनी प्रशासकपदी वर्णी लागावी यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील रावळगाव, चंदनपुरी, झोडगे, देवघट, डोंगराळे, कळवाडी, खाकुर्डी, रावळगाव, टेहरे, वडगाव, दहिवाळ, चिखल ओहोळ, अजंग, अस्ताने, आघार(खु) आघार (बु) आदी गावांसह इतर गावांमध्ये प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर निवडणुका होणार आहेत. यामुळे या प्रशासकीय नियुक्तीवरच पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.प्रशासक नियुक्तीच्या अध्यादेशाने नाराजीसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाने एससी, एसटी, ओबीसी तसेच महिलांमध्ये नाराजी पसरली असून, अध्यादेशात सामाजिक आरक्षण, महिला, अपंग, तृतीय पंथीय यासंदर्भात निर्देश नसल्याने या अध्यादेशाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य सोनल कर्डक यांनी दिला आहे. कर्डक यांनी म्हटले आहे, या अध्यादेशात नियुक्त करावयाच्या प्रशासकाच्या संदर्भात वयाची, शिक्षणाची अट नाही, गुन्हेगार असावा की नसावा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, महिला, सामाजिक आरक्षण, शैक्षणिक गुणवत्ता याबाबत कुठलेही निर्देश दिलेले नसल्याचे कर्डक यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक