शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

५७ हजार नळजोडणीधारकांना अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:15 IST

महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या असून, त्यातील १० हजार ५५० थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. अद्याप ५७ हजार थकबाकीदारांनी भरणा न केल्याने संबंधितांची नळजोडणी बंद केली जाणार आहे. याशिवाय बंद केलेली जोडणी अनधिकृतपणे पुन्हा सुरू केल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.

नाशिक : महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या असून, त्यातील १० हजार ५५० थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. अद्याप ५७ हजार थकबाकीदारांनी भरणा न केल्याने संबंधितांची नळजोडणी बंद केली जाणार आहे. याशिवाय बंद केलेली जोडणी अनधिकृतपणे पुन्हा सुरू केल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.  महापालिकेने करवसुलीसाठी थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टी थकविणाºया ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातील १० हजार ५५० नळजोडणीधारकांनीच थकबाकीचा भरणा भरण्यास प्रतिसाद दिलेला आहे. सदर थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. जे नळजोडणीधारक १५ दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरणार नाहीत, अशा नळजोडणीधारकांची जोडणी बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत १९ कोटी ९७ लाख रुपये पाणीपट्टी वसूल केलेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपट्टी वसुलीत ९ कोटी २९ लाख रुपयांनी वाढ झालेली आहे. सर्वाधिक पाणीपट्टीची वसुली सिडको विभागातून ४ कोटी ७८ लाख रुपये झाली आहे, तर सातपूर विभागातून २ कोटी ५ लाख, पश्चिममधून ३ कोटी, पूर्वमधून ३ कोटी ५१ लाख, पंचवटीतून २ कोटी ७१ लाख, नाशिकरोडमधून ३ कोटी ८९ लाख रुपयांची वसुली झालेली आहे. दरम्यान, महापालिकेमार्फत अद्यापही असंख्य नळजोडणीधारकांना पाणीपट्टीची बिले जाऊन पोहोचलेली नाही. सुमारे वर्षभराच्या कालावधीत पाणीपट्टीची बिले न मिळाल्याने सोसायट्या, अपार्टमेंट यांना येणाºया बिलाची रक्कम मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे महापालिकेकडे त्याबाबत विचारणा होण्याची शक्यता आहे. मालमत्ता करात १२ कोटींनी वाढमहापालिकेने गत वर्षाच्या तुलनेत १२ कोटी ५८ लाख रुपये जास्त घरपट्टीची वसुली केली आहे. गतवर्षी सात महिन्यांत ४५ कोटी १८ लाख रुपये मालमत्ताकर वसूल झाला होता. यंदा सात महिन्यांत ५७ कोटी ७६ लाख रुपये वसुली झाली आहे. महापालिकेने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सवलत योजना राबविली होती. या सवलत योजनेतूनच महापालिकेला ३४ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. त्यानंतरच्या चार महिन्यांत महापालिकेने २३ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. सौर ऊर्जेचा वापर करणाºया ७६४४ मिळकतधारकांना ७ लाख ८० हजारांची तर पाच, तीन आणि दोन या टक्केवारीतून ८९ लाख रुपये सवलत देण्यात आलेली आहे. ई पेमेंट करणाºया ४१ हजार ८२१ ग्राहकांना ६ लाख ४१ हजाराची सवलत देण्यात आलेली आहे.