शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

राष्ट्रीय लोकअदालतीत 529 प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: February 15, 2015 23:01 IST

राष्ट्रीय लोकअदालतीत 529 प्रकरणांचा निपटारा

नाशिक : जिल्हा न्यायालयासह संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ५२९ खटले परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यात येऊन सुमारे तीन कोटी रुपयांची तडजोड झाली़ यामध्ये दिवाणी, फौजदारी, बँक व त्यांची दाखलपूर्व अशा प्रकारची ६ हजार ५८० प्रकरणे ठेवण्यात आली होती़जिल्हाभरात बँकेची दिवाणी स्वरूपातील ११६ प्रकरणांपैकी ११ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ एनआय अ‍ॅक्ट कलम १३८ अर्थात धनादेश न वटल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल झालेली ११ अपिले ठेवण्यात आली होती़ त्यापैकी २ प्रकरणे निकाली निघाली, तर धनादेश न वटल्याच्या १०२० प्रकरणांपैकी २३३, तर बँकेच्या दावा दाखलपूर्व ५४३३ प्रकरणांपैकी २८३ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यामध्ये ३ कोटी ६ लाख १६ हजार ६९१ रुपयांची तडजोड करण्यात आली़या राष्ट्रीय लोकअदालतीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. कदम, जी़ ए़ रामटेके, व्ही़ जी़ रघुवंशी, व्ही़ पी़ कदम, एस. एम. पाटील, ए़ एस़ भागवत, उल्का जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)