शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

गंगापूर धरणात ५१ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: March 20, 2017 21:21 IST

अपव्यय करणाऱ्यांवर होणार कारवाई.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २० मार्चअखेर ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २० मार्चअखेर ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पाणीसाठा पुरेसा असला तरी उन्हाळ्यात पाणीबचतीचे आवाहन महापालिकेने केले आहे. याशिवाय, पाण्याचा गैरवापर व अपव्यय करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेला दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी गंगापूर धरणात ३९०० दलघफू तर दारणातील ४०० दलघफू याप्रमाणे एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत गंगापूर धरणातील सुमारे १५५० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. सदर पाणीसाठा महापालिकेला ३१ जुलैपर्यंत पुरवायचा आहे. २० मार्चअखेर गंगापूर धरणात २८६३ दलघफू म्हणजे ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर धरण समूहातील काश्यपी धरणात १७७७ दलघफू म्हणजे ९६ टक्के, गौतमी गोदावरीत २९७ दलघफू म्हणजे १६ टक्के तर आळंदीत ४६४ दलघफू म्हणजे ४८ टक्के पाणीसाठा आहे. एकूण गंगापूर धरणसमूहात ५४०१ म्हणजे ५२ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी २० मार्चअखेर गंगापूर धरणात १७३९ दलघफू म्हणजे अवघा ३१ टक्के पाणीसाठा होता, तर धरणसमूहात अवघा २६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गंगापूर धरणात जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे जिल्हा प्रशासन व महापालिकेमार्फत सांगितले जात असले तरी दुसरीकडे पाणीबचतीचेही आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत गंगापूर धरणातून रोज सुमारे ४१५ ते ४२० दशलक्ष लिटर्स पाण्याची उचल केली जात आहे. याशिवाय, कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचाही वेग वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.