शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

कांदा लागवडीत ५० हजार हेक्टरची वाढ होणार?

By admin | Updated: January 11, 2017 01:11 IST

कांदा रडवणार : आवक वाढण्याची चिन्हे

नाशिक : यंदा चांगला पाऊस झाल्याने कांद्याच्या क्षेत्रातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंतच्या कांदा लागवडीवरून दिसून येत आहे. मागील वर्षापेक्षा तब्बल ४० ते ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड वाढण्याची चिन्हे असल्याने या वर्षीही कांदा शेतकऱ्यांना रडविण्याची चिन्हे आहेत.  या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. मात्र मागील वर्षभर कांद्याला चांगले दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा अक्षरश: मातीमोल भावाने विकावा लागला आहे. यामुळे यावर्षी चांगला पाऊस होऊनही कांद्याचे क्षेत्रात घट येईल, असे मानले जात होते. खरीप व लेट खरिपाच्या बाबतीत तो अंदाज मात्र खरा ठरताना दिसत आहे. मागील वर्षी लेट खरीप कांद्याचे क्षेत्र ५१ हजार हेक्टरवर होते.  यावर्षी मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आकडेवारीनुसार ३४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी संपूर्ण वर्षभरात नाशिक जिल्ह्णात एक लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर तिन्ही हंगामांतील कांद्याची लागवड झाली होती. नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत एक तर शेतकरी गहू, हरभरा घेऊ शकतो. परंतु त्याला नगदी पीक म्हणून या काळात दुसऱ्या कोणत्याही पिकाचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शेत रिकामे ठेवण्यापेक्षा कांदा पिकाची लागवड करीत असतो. त्यात यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे विहिरींना पाणीही चांगले आहे. यामुळे शेतकरी कांद्याकडे वळला असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. (प्रतिनिधी)