शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

पाणीयोजनेत ५० टक्के कपात

By admin | Updated: June 5, 2016 00:06 IST

जलसंकट : चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा होणार आठवड्यानंतर

 सिन्नर : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या वावीसह ११ गाव पाणीपुरवठा योजनेवर गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच जलसंकट ओढावले आहे. योजनेच्या तळ्यात पाणीसाठा कमी राहिल्याने व आवर्तन सुटण्यास उशीर असल्याने ५० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष तथा वावीचे उपसरपंच विजय काटे यांनी दिली. गेल्या पाच वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वावीसह अकरा गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणीयोजना राबविण्यात आली आहे. या पाणीयोजनेमुळे वावी व परिसरातील दहा गावांना गेल्या चार वर्षांत अजिबात पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र यावर्षी या योजनेवर पाणीकपातीची वेळ आली आहे. वावी, कहांडळवाडी, मिठसागरे, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मिरगाव, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी व शहा या ११ गावांचा समावेश या पाणीयोजनेत करण्यात आला आहे. गोदावरी उजव्या कालव्याजवळ कोळगावमाळ शिवारात मोठा तलाव करून त्यात पाणी साठविण्यात आले आहे. या तलावाशेजारीच जलशुद्धीकरण केंद्र असून त्याद्वारे योजनेतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. शिर्डी व राहाता पाणीयोजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्याला दर दोन महिन्यांतर आवर्तन सुटते. त्यावेळी या योजनेचे तळे भरले जाते. मात्र सध्या आवर्तन सुटण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे तळ्यातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. योजनेच्या तळ्यात केवळ १ ते सव्वा मीटर पाणी शिल्लक आहे. पाऊस झाल्यानंतर गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सुटू शकते. त्यामुळे तळ्यातील पाणी आवर्तन सुटेपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे पाणीयोजनेत समाविष्ट असणाऱ्या अकरा गावांचा पाणीपुरवठा ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या गावांना चारऐवजी आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळणार आहे. गोदावरी कालव्याला पाणी सुटल्यानंतर या योजनेवरील जलसंकट दूर होईल. गेल्या चार वर्षांत वावीसह अकरा गावांना वरदान ठरणारी पाणीयोजना यावर्षीच्या दुष्काळामुळे संकटात सापडली आहे. (वार्ताहर)