शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

पाणीयोजनेत ५० टक्के कपात

By admin | Updated: June 5, 2016 00:06 IST

जलसंकट : चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा होणार आठवड्यानंतर

 सिन्नर : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या वावीसह ११ गाव पाणीपुरवठा योजनेवर गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच जलसंकट ओढावले आहे. योजनेच्या तळ्यात पाणीसाठा कमी राहिल्याने व आवर्तन सुटण्यास उशीर असल्याने ५० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष तथा वावीचे उपसरपंच विजय काटे यांनी दिली. गेल्या पाच वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वावीसह अकरा गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणीयोजना राबविण्यात आली आहे. या पाणीयोजनेमुळे वावी व परिसरातील दहा गावांना गेल्या चार वर्षांत अजिबात पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र यावर्षी या योजनेवर पाणीकपातीची वेळ आली आहे. वावी, कहांडळवाडी, मिठसागरे, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मिरगाव, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी व शहा या ११ गावांचा समावेश या पाणीयोजनेत करण्यात आला आहे. गोदावरी उजव्या कालव्याजवळ कोळगावमाळ शिवारात मोठा तलाव करून त्यात पाणी साठविण्यात आले आहे. या तलावाशेजारीच जलशुद्धीकरण केंद्र असून त्याद्वारे योजनेतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. शिर्डी व राहाता पाणीयोजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्याला दर दोन महिन्यांतर आवर्तन सुटते. त्यावेळी या योजनेचे तळे भरले जाते. मात्र सध्या आवर्तन सुटण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे तळ्यातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. योजनेच्या तळ्यात केवळ १ ते सव्वा मीटर पाणी शिल्लक आहे. पाऊस झाल्यानंतर गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सुटू शकते. त्यामुळे तळ्यातील पाणी आवर्तन सुटेपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे पाणीयोजनेत समाविष्ट असणाऱ्या अकरा गावांचा पाणीपुरवठा ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या गावांना चारऐवजी आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळणार आहे. गोदावरी कालव्याला पाणी सुटल्यानंतर या योजनेवरील जलसंकट दूर होईल. गेल्या चार वर्षांत वावीसह अकरा गावांना वरदान ठरणारी पाणीयोजना यावर्षीच्या दुष्काळामुळे संकटात सापडली आहे. (वार्ताहर)