शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

पाणीयोजनेत ५० टक्के कपात

By admin | Updated: June 5, 2016 00:06 IST

जलसंकट : चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा होणार आठवड्यानंतर

 सिन्नर : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या वावीसह ११ गाव पाणीपुरवठा योजनेवर गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच जलसंकट ओढावले आहे. योजनेच्या तळ्यात पाणीसाठा कमी राहिल्याने व आवर्तन सुटण्यास उशीर असल्याने ५० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष तथा वावीचे उपसरपंच विजय काटे यांनी दिली. गेल्या पाच वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वावीसह अकरा गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणीयोजना राबविण्यात आली आहे. या पाणीयोजनेमुळे वावी व परिसरातील दहा गावांना गेल्या चार वर्षांत अजिबात पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र यावर्षी या योजनेवर पाणीकपातीची वेळ आली आहे. वावी, कहांडळवाडी, मिठसागरे, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मिरगाव, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी व शहा या ११ गावांचा समावेश या पाणीयोजनेत करण्यात आला आहे. गोदावरी उजव्या कालव्याजवळ कोळगावमाळ शिवारात मोठा तलाव करून त्यात पाणी साठविण्यात आले आहे. या तलावाशेजारीच जलशुद्धीकरण केंद्र असून त्याद्वारे योजनेतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. शिर्डी व राहाता पाणीयोजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्याला दर दोन महिन्यांतर आवर्तन सुटते. त्यावेळी या योजनेचे तळे भरले जाते. मात्र सध्या आवर्तन सुटण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे तळ्यातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. योजनेच्या तळ्यात केवळ १ ते सव्वा मीटर पाणी शिल्लक आहे. पाऊस झाल्यानंतर गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सुटू शकते. त्यामुळे तळ्यातील पाणी आवर्तन सुटेपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे पाणीयोजनेत समाविष्ट असणाऱ्या अकरा गावांचा पाणीपुरवठा ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या गावांना चारऐवजी आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळणार आहे. गोदावरी कालव्याला पाणी सुटल्यानंतर या योजनेवरील जलसंकट दूर होईल. गेल्या चार वर्षांत वावीसह अकरा गावांना वरदान ठरणारी पाणीयोजना यावर्षीच्या दुष्काळामुळे संकटात सापडली आहे. (वार्ताहर)