शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
3
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
4
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
5
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
6
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
7
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
8
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
9
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
10
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
11
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
12
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
13
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
14
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
15
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
16
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
17
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
18
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
19
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
20
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

रेशन दुकानदारांना ५० लाखांची मदत फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नाशिक: कोरेाना काळात धान्य वाटपाचे काम करणाऱ्या अनेक रेशन दुकानदारांना जीव गमवावा लागला. अत्यावश्यक बाब म्हणून रेशन दुकानदारांच्या माध्यमातून ...

नाशिक: कोरेाना काळात धान्य वाटपाचे काम करणाऱ्या अनेक रेशन दुकानदारांना जीव गमवावा लागला. अत्यावश्यक बाब म्हणून रेशन दुकानदारांच्या माध्यमातून नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले. या यंत्रणेचे कामकाज लक्षात घेऊन रेशन दुकानदारांना ५० लाखांचे आर्थिक संरक्षण देण्याची मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेने केली होती. ही मागणी अन्न पुरवठा विभागाकडून नाकारण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात कुणीही नागरिक अन्नधान्याविना राहू नये म्हणून केंद्राने मोफत धान्य योजना तसेच राज्याची नियमित धान्य वाटप योजना सुरू होती. रेशन दुकानदारांच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात आले. जनतेशी थेट संपर्क आल्याने अनेक रेशन धान्य दुकानदारांना जीव गमवावा लागला. त्यामुळे दुकानदारांना विमा संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र आता शासनाने ही मागणी फेटाळून लावली आहे. रेशन दुकानदार सरकारी कर्मचारी नसल्याने त्यांना ही मदत देता येणार नसल्याची भूमिका वित्त विभागाने घेतली असून, तसे अन्न पुरवठा विभागाने रेशन दुकानदार संघटनांना कळविले आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे गेल्या आठ महिन्यांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाने पोलीस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेल्यास मृताच्या परिवाराला ५० लाखांची मदत जाहीर केली होती. त्याप्रमाणेच रेशन दुकानदारही जीव संकटात घालून कामकाज करीत असल्याने, तसेच रोज नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे अनेक रेशन दुकानदारांना कोरोनाची लागण झाली. राज्यभरात ५० रेशन दुकानदारांचा कोरोनाने मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातही ७ रेशन दुकानदारांचा मृत्यू झाला. त्यामध्ये नाशिक, इगतपुरी, सिन्नर व निफाड तालुक्यातील रेशन दुकानदारांचा समावेश आहे.

या घटनांमुळे मयत रेशन दुकानदारांच्या परिवारालादेखील ५० लाखांची आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी अन्न पुरवठा मंत्रालयानेदेखील सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे पाठविण्यात आलेला होता; परंतु दुकानदार हे शासकीय कर्मचारी नसल्याने त्यांना अशा प्रकारचे संरक्षण देता येणार नसल्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे रेशन दुकानदार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अन्न पुरवठा विभागाने पुनर्विचारार्थ हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे.

--कोट----

शासन दुकानदारांकडून योजना राबवून घेत असून, संरक्षण मात्र नाकारत असेल तर हा अन्याय आहे. राज्यात ५० तर जिल्ह्यात ७ दुकानदार मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत शासनाने फेरविचार करावा, याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनात्मक निर्णय घ्यावा लागेल.

- निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष स्वस्त रेशन धान्य दुकान संघटना.