शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

जिल्हा परिषदेला ५० कोटींचा निधी

By admin | Updated: May 8, 2016 00:23 IST

‘पायगुण’ : पंचायतराज समितीच्या दौऱ्याचा परिणाम

नाशिक : पंचायतराज समितीच्या दौऱ्यामुळे प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिल्याची चर्चा असतानाच याच पंचायत राज समितीच्या नाशिक दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेला तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संभाजीराव निलंगेकर-पाटील यांनीच याबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये तसे सुतोवाच केले. आम्ही नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर येथे तीन दिवसांत कामकाजाचा आढावा घेतला. काही शक पूर्ततेबाबत विचारणा केली. तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागांकडील थकीत असलेले सुमारे २४ कोटी रुपये नाशिक जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना समितीचे उपसचिव विलास आठवले यांना सांगितल्याचे आमदार निलंगेकर-पाटील यांनी सांगितले.तसेच अन्य काही योजनांचीही थकबाकी मिळून एकूण ५० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला आम्ही उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारला दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेला इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही निधी उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्याची विकासकामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच काही अल्पशा निधीमुळे रखडलेली कामे व पाणीपुरवठा योजनाही पूर्ण होण्यास मदत होणार आहे. काही विभागांकडे जिल्हा परिषदेची असलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकीची रक्कम जिल्हा परिषदेत जमा करण्याचे आदेश त्या त्या विभागांना दिले आहेत. आमची समिती नाशिक जिल्हा परिषदेला किमान ५० कोटींचा निधी विकासासाठी उपलब्ध करून देत असल्याचे पंचायतराज समितीचे अध्यक्ष आमदार संभाजीराव निलंगेकर-पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)