शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार विषयशिक्षक होणार मान्यताप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:47 IST

नाशिक : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी असल्यामुळे शाळांना विषय शिक्षक मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने विषय शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात सुमारे ५ हजार शिक्षकांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची कार्यवाही प्रत्येक जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांनी सुरू केली असली तरी काही जिल्ह्णांना मात्र अजूनही प्रक्रिया राबविण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकार्यवाही मात्र संथगतीने : नाशिकसह अनेक जिल्ह्यांची उदासीनता

नाशिक : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी असल्यामुळे शाळांना विषय शिक्षक मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने विषय शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात सुमारे ५ हजार शिक्षकांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची कार्यवाही प्रत्येक जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांनी सुरू केली असली तरी काही जिल्ह्णांना मात्र अजूनही प्रक्रिया राबविण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने २०१२ पासून शिक्षक भरतीला मनाई केली आहे. जिल्ह्णांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली नसल्यामुळे खासगी आस्थापनांच्या शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव रखडले आहेत. २०१२ आणि त्यानंतर खासगी आस्थापनांमध्ये अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. मात्र शालेय शिक्षणात इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय महत्त्वाचे असल्याने खासगी शाळांनी आपल्या स्तरावर अशा शिक्षकांची नेमणूक करून त्यांचे प्रस्तावही मान्यतेसाठी शासनाकडे पाठविले, मात्र शासनाच्या धोरणानुसार त्यांना मान्यता देण्यात आलेले नव्हती. अशा प्रकारचे ५,२२७ च्या जवळपास विषय शिक्षक मान्यतेच्या प्रतीक्षेत होते. विषय शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषय शिक्षकांच्या मान्यतेला मान्यता देत येत्या सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.मात्र आत्तापर्यंत राज्यातून जवळपास केवळ दीड हजार इतकीच प्रकरणे मंजुरीसाठी आली असल्याचे शिक्षण संचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. शिक्षक बदली, प्रशिक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षणाधिकारी अडल्यामुळे मान्य-तेच्या कामाला सुरुवात झालेली नाही. प्रस्तावाच्या त्रुटीपूर्ततेसाठी धावाधावशिक्षक भरतीप्रक्रिया बंद असल्यामुळे संस्थांनी शाळांची गरज लक्षात घेऊन शिक्षक नियुक्ती केली होती. राज्य शासनाने या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने विषय शिक्षकांच्या भरतीला हिरवा कंदील दिल्यामुळे कार्यवाही सुरू झाली आहे. तेव्हा सादर केलेल्या प्रस्तावांची विभागाने पडताळणीच केली नसल्यामुळे आता अनेक प्रकरणातील त्रुटी निघाल्याने या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी धावपळ होत आहे.माहिती मिळविण्यात अडचणीराज्य शासनाने शिक्षक मान्यतेसाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत. मात्र या अटींनुसार कामकाज करताना शिक्षण विभागाची धावपळ होत आहे. शिक्षक मान्यता देताना आरक्षण, बिंदूनामावली, अनुशेषनुसार पदभरती केलेली नसल्यास मान्यता देऊ नये, अतिरिक्त उमेदवाराल रुजू करून घेतले नसेल तर मान्यता देऊ नये, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव अमान्य करताना कोणतेही एक कारण न देता सर्व कारणे स्पष्ट नमूद करावीत, अशा अटी असल्याने शिक्षण विभाग सवडीनुसार काम करताना दिसत आहे.