शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

पाच हजार विषयशिक्षक होणार मान्यताप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:47 IST

नाशिक : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी असल्यामुळे शाळांना विषय शिक्षक मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने विषय शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात सुमारे ५ हजार शिक्षकांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची कार्यवाही प्रत्येक जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांनी सुरू केली असली तरी काही जिल्ह्णांना मात्र अजूनही प्रक्रिया राबविण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकार्यवाही मात्र संथगतीने : नाशिकसह अनेक जिल्ह्यांची उदासीनता

नाशिक : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी असल्यामुळे शाळांना विषय शिक्षक मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने विषय शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात सुमारे ५ हजार शिक्षकांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची कार्यवाही प्रत्येक जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांनी सुरू केली असली तरी काही जिल्ह्णांना मात्र अजूनही प्रक्रिया राबविण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने २०१२ पासून शिक्षक भरतीला मनाई केली आहे. जिल्ह्णांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली नसल्यामुळे खासगी आस्थापनांच्या शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव रखडले आहेत. २०१२ आणि त्यानंतर खासगी आस्थापनांमध्ये अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. मात्र शालेय शिक्षणात इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय महत्त्वाचे असल्याने खासगी शाळांनी आपल्या स्तरावर अशा शिक्षकांची नेमणूक करून त्यांचे प्रस्तावही मान्यतेसाठी शासनाकडे पाठविले, मात्र शासनाच्या धोरणानुसार त्यांना मान्यता देण्यात आलेले नव्हती. अशा प्रकारचे ५,२२७ च्या जवळपास विषय शिक्षक मान्यतेच्या प्रतीक्षेत होते. विषय शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषय शिक्षकांच्या मान्यतेला मान्यता देत येत्या सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.मात्र आत्तापर्यंत राज्यातून जवळपास केवळ दीड हजार इतकीच प्रकरणे मंजुरीसाठी आली असल्याचे शिक्षण संचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. शिक्षक बदली, प्रशिक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षणाधिकारी अडल्यामुळे मान्य-तेच्या कामाला सुरुवात झालेली नाही. प्रस्तावाच्या त्रुटीपूर्ततेसाठी धावाधावशिक्षक भरतीप्रक्रिया बंद असल्यामुळे संस्थांनी शाळांची गरज लक्षात घेऊन शिक्षक नियुक्ती केली होती. राज्य शासनाने या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने विषय शिक्षकांच्या भरतीला हिरवा कंदील दिल्यामुळे कार्यवाही सुरू झाली आहे. तेव्हा सादर केलेल्या प्रस्तावांची विभागाने पडताळणीच केली नसल्यामुळे आता अनेक प्रकरणातील त्रुटी निघाल्याने या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी धावपळ होत आहे.माहिती मिळविण्यात अडचणीराज्य शासनाने शिक्षक मान्यतेसाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत. मात्र या अटींनुसार कामकाज करताना शिक्षण विभागाची धावपळ होत आहे. शिक्षक मान्यता देताना आरक्षण, बिंदूनामावली, अनुशेषनुसार पदभरती केलेली नसल्यास मान्यता देऊ नये, अतिरिक्त उमेदवाराल रुजू करून घेतले नसेल तर मान्यता देऊ नये, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव अमान्य करताना कोणतेही एक कारण न देता सर्व कारणे स्पष्ट नमूद करावीत, अशा अटी असल्याने शिक्षण विभाग सवडीनुसार काम करताना दिसत आहे.