शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पाच हजार विषयशिक्षक होणार मान्यताप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:47 IST

नाशिक : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी असल्यामुळे शाळांना विषय शिक्षक मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने विषय शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात सुमारे ५ हजार शिक्षकांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची कार्यवाही प्रत्येक जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांनी सुरू केली असली तरी काही जिल्ह्णांना मात्र अजूनही प्रक्रिया राबविण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकार्यवाही मात्र संथगतीने : नाशिकसह अनेक जिल्ह्यांची उदासीनता

नाशिक : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी असल्यामुळे शाळांना विषय शिक्षक मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने विषय शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात सुमारे ५ हजार शिक्षकांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची कार्यवाही प्रत्येक जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांनी सुरू केली असली तरी काही जिल्ह्णांना मात्र अजूनही प्रक्रिया राबविण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने २०१२ पासून शिक्षक भरतीला मनाई केली आहे. जिल्ह्णांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली नसल्यामुळे खासगी आस्थापनांच्या शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव रखडले आहेत. २०१२ आणि त्यानंतर खासगी आस्थापनांमध्ये अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. मात्र शालेय शिक्षणात इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय महत्त्वाचे असल्याने खासगी शाळांनी आपल्या स्तरावर अशा शिक्षकांची नेमणूक करून त्यांचे प्रस्तावही मान्यतेसाठी शासनाकडे पाठविले, मात्र शासनाच्या धोरणानुसार त्यांना मान्यता देण्यात आलेले नव्हती. अशा प्रकारचे ५,२२७ च्या जवळपास विषय शिक्षक मान्यतेच्या प्रतीक्षेत होते. विषय शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषय शिक्षकांच्या मान्यतेला मान्यता देत येत्या सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.मात्र आत्तापर्यंत राज्यातून जवळपास केवळ दीड हजार इतकीच प्रकरणे मंजुरीसाठी आली असल्याचे शिक्षण संचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. शिक्षक बदली, प्रशिक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षणाधिकारी अडल्यामुळे मान्य-तेच्या कामाला सुरुवात झालेली नाही. प्रस्तावाच्या त्रुटीपूर्ततेसाठी धावाधावशिक्षक भरतीप्रक्रिया बंद असल्यामुळे संस्थांनी शाळांची गरज लक्षात घेऊन शिक्षक नियुक्ती केली होती. राज्य शासनाने या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने विषय शिक्षकांच्या भरतीला हिरवा कंदील दिल्यामुळे कार्यवाही सुरू झाली आहे. तेव्हा सादर केलेल्या प्रस्तावांची विभागाने पडताळणीच केली नसल्यामुळे आता अनेक प्रकरणातील त्रुटी निघाल्याने या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी धावपळ होत आहे.माहिती मिळविण्यात अडचणीराज्य शासनाने शिक्षक मान्यतेसाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत. मात्र या अटींनुसार कामकाज करताना शिक्षण विभागाची धावपळ होत आहे. शिक्षक मान्यता देताना आरक्षण, बिंदूनामावली, अनुशेषनुसार पदभरती केलेली नसल्यास मान्यता देऊ नये, अतिरिक्त उमेदवाराल रुजू करून घेतले नसेल तर मान्यता देऊ नये, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव अमान्य करताना कोणतेही एक कारण न देता सर्व कारणे स्पष्ट नमूद करावीत, अशा अटी असल्याने शिक्षण विभाग सवडीनुसार काम करताना दिसत आहे.