शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जिल्ह्यात रब्बीची ८१ टक्के पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:50 IST

नाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्रापैकी ९२ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावर (८१.६२ टक्के) ...

नाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्रापैकी ९२ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावर (८१.६२ टक्के) विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली असून, गव्हाची सर्वाधिक ५१,९३९ हेक्टरवर तर त्या खालोखाल हरभऱ्याची ३०,२५७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे ज्वारीचा पेराही वाढला असून, जिल्ह्यात एकूण ४५९४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. दुष्काळी समजल्या जाणाºया सिन्नर तालुक्यात यावर्षी निश्चित क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर (२८५२ हेक्टर) ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे, तर मालेगाव तालुक्यात गव्हाचे क्षेत्र वाढले असून, या तालुक्यात तब्बल ९११७ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. पेठसारख्या आदिवासी तालुक्यात यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेण्याचा प्रयोग केला असून, तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र नसतानाही १० हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.यावर्षी झालेला समाधानकारक पाऊस, धरण साठ्यांमध्ये झालेली वाढ यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. अनेक ठिकाणी विहिरी, नदी, नाले भरलेले असल्यामुळे रब्बीच्या पिकांना पाणी देता येणार असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शेतकºयांना अपेक्षा आहे. जिल्हात तृणधान्याचे एकूण ७०,७६४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी आतापर्यंत ६०,१३० हेक्टरवर ज्वारी, गहू, मका आणि इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. तृणधान्यामध्ये गव्हाला शेतकºयांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. गव्हाच्या ६१,९६७ हेक्टर क्षेत्रापैकी ५१,९३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मालेगाव तालुक्यात गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तालुक्यात ९११७ हेक्टरवर शेतकºयांनी गव्हाची पेरणी केली आहे. सिन्नर तालुक्यातही गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.डाळवर्गीय पिकांमध्ये यावर्षी हरभºयाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून एकूण ४११८४ हेक्टर क्षेत्रापैकी ३०२५७ हेक्टरवर शेतकºयांनी हरभºयाची पेरणी केली आहे. दिंडोरी, सिन्नर, येवला, मालेगाव या तालुक्यांमध्ये हरभºयाचे क्षेत्र वाढले आहे. कळवण, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, पेठ या तालुक्यातील शेतकºयांनी हरभºयाबरोबच इतर डाळवर्गीय पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात डाळवर्गीय पिकांचे एकूण ४२१५२ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत ३२२४६ हेक्टरवर शेतकºयांनी डाळवर्गीय पिकांची पेरणी केली आहे. जवस, तीळ, सूर्यफूल या तेलबीयांचा पेरा खूपच कमी झाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती