शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जिल्ह्यात रब्बीची ८१ टक्के पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:50 IST

नाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्रापैकी ९२ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावर (८१.६२ टक्के) ...

नाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्रापैकी ९२ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावर (८१.६२ टक्के) विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली असून, गव्हाची सर्वाधिक ५१,९३९ हेक्टरवर तर त्या खालोखाल हरभऱ्याची ३०,२५७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे ज्वारीचा पेराही वाढला असून, जिल्ह्यात एकूण ४५९४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. दुष्काळी समजल्या जाणाºया सिन्नर तालुक्यात यावर्षी निश्चित क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर (२८५२ हेक्टर) ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे, तर मालेगाव तालुक्यात गव्हाचे क्षेत्र वाढले असून, या तालुक्यात तब्बल ९११७ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. पेठसारख्या आदिवासी तालुक्यात यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेण्याचा प्रयोग केला असून, तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र नसतानाही १० हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.यावर्षी झालेला समाधानकारक पाऊस, धरण साठ्यांमध्ये झालेली वाढ यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. अनेक ठिकाणी विहिरी, नदी, नाले भरलेले असल्यामुळे रब्बीच्या पिकांना पाणी देता येणार असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शेतकºयांना अपेक्षा आहे. जिल्हात तृणधान्याचे एकूण ७०,७६४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी आतापर्यंत ६०,१३० हेक्टरवर ज्वारी, गहू, मका आणि इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. तृणधान्यामध्ये गव्हाला शेतकºयांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. गव्हाच्या ६१,९६७ हेक्टर क्षेत्रापैकी ५१,९३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मालेगाव तालुक्यात गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तालुक्यात ९११७ हेक्टरवर शेतकºयांनी गव्हाची पेरणी केली आहे. सिन्नर तालुक्यातही गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.डाळवर्गीय पिकांमध्ये यावर्षी हरभºयाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून एकूण ४११८४ हेक्टर क्षेत्रापैकी ३०२५७ हेक्टरवर शेतकºयांनी हरभºयाची पेरणी केली आहे. दिंडोरी, सिन्नर, येवला, मालेगाव या तालुक्यांमध्ये हरभºयाचे क्षेत्र वाढले आहे. कळवण, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, पेठ या तालुक्यातील शेतकºयांनी हरभºयाबरोबच इतर डाळवर्गीय पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात डाळवर्गीय पिकांचे एकूण ४२१५२ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत ३२२४६ हेक्टरवर शेतकºयांनी डाळवर्गीय पिकांची पेरणी केली आहे. जवस, तीळ, सूर्यफूल या तेलबीयांचा पेरा खूपच कमी झाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती