शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रब्बीची ८१ टक्के पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:50 IST

नाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्रापैकी ९२ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावर (८१.६२ टक्के) ...

नाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्रापैकी ९२ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावर (८१.६२ टक्के) विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली असून, गव्हाची सर्वाधिक ५१,९३९ हेक्टरवर तर त्या खालोखाल हरभऱ्याची ३०,२५७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे ज्वारीचा पेराही वाढला असून, जिल्ह्यात एकूण ४५९४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. दुष्काळी समजल्या जाणाºया सिन्नर तालुक्यात यावर्षी निश्चित क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर (२८५२ हेक्टर) ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे, तर मालेगाव तालुक्यात गव्हाचे क्षेत्र वाढले असून, या तालुक्यात तब्बल ९११७ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. पेठसारख्या आदिवासी तालुक्यात यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेण्याचा प्रयोग केला असून, तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र नसतानाही १० हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.यावर्षी झालेला समाधानकारक पाऊस, धरण साठ्यांमध्ये झालेली वाढ यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. अनेक ठिकाणी विहिरी, नदी, नाले भरलेले असल्यामुळे रब्बीच्या पिकांना पाणी देता येणार असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शेतकºयांना अपेक्षा आहे. जिल्हात तृणधान्याचे एकूण ७०,७६४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी आतापर्यंत ६०,१३० हेक्टरवर ज्वारी, गहू, मका आणि इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. तृणधान्यामध्ये गव्हाला शेतकºयांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. गव्हाच्या ६१,९६७ हेक्टर क्षेत्रापैकी ५१,९३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मालेगाव तालुक्यात गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तालुक्यात ९११७ हेक्टरवर शेतकºयांनी गव्हाची पेरणी केली आहे. सिन्नर तालुक्यातही गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.डाळवर्गीय पिकांमध्ये यावर्षी हरभºयाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून एकूण ४११८४ हेक्टर क्षेत्रापैकी ३०२५७ हेक्टरवर शेतकºयांनी हरभºयाची पेरणी केली आहे. दिंडोरी, सिन्नर, येवला, मालेगाव या तालुक्यांमध्ये हरभºयाचे क्षेत्र वाढले आहे. कळवण, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, पेठ या तालुक्यातील शेतकºयांनी हरभºयाबरोबच इतर डाळवर्गीय पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात डाळवर्गीय पिकांचे एकूण ४२१५२ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत ३२२४६ हेक्टरवर शेतकºयांनी डाळवर्गीय पिकांची पेरणी केली आहे. जवस, तीळ, सूर्यफूल या तेलबीयांचा पेरा खूपच कमी झाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती