शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५ लाख नाशिककर झाले विमेकरी

By admin | Updated: May 28, 2015 00:09 IST

प्रधानमंत्री विमा योजना : कालावधी जून २०१५ ते मे २०१६

नाशिक : देशातील ८० टक्केनागरिक विमा क्षेत्राच्या बाहेर असल्याने कष्टकरी लोकांनाही विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्राने सुरू केलेल्या विमा योजनांना नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ १७ दिवसांतच ही संख्या पाच लाखांवर पोहोचली आहे. अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या त्या तीन प्रकारच्या योजना आहेत. सुरक्षा विमा आणि जीवनज्योती या दोन्ही योजना अनुक्रमे १२ आणि ३३० रुपयांच्या असून, त्यांना चांगला प्रतिसाद आहे. केवळ १२ रुपयांत अपघात विमा आणि ३३० रुपयांत नैसर्गिक मृत्यू आल्यास २ लाख रुपयांचा परतावा त्यातून मिळणार आहे. पेन्शन योजनेत सहभागी झाल्यानंतर आजचा युवक भविष्यात मुलांवर अवलंबून राहणार नाही. याशिवाय विमा योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना आणि त्यांच्या वारसांना या योजनेतून अपघातानंतर मदत दिली जाईल. ९ मे रोजी या योजनांचे उद्घाटन झाले तेव्हाच नाशिक जिल्ह्यात सुमारे एक लाख ६५ हजार लोकांनी यासाठी नोंदणी केली होती. त्यानंतर दररोज या योजनेला प्रतिसाद मिळत असून, सर्व बॅँकांचे मिळून सुमारे ५ लाख नागरिकांनी विम्याचे कवच विकत घेतले आहे. हा विमा उतरवण्यासाठी खासगी बॅँकांनाही परवानगी देण्यात आल्याने बॅँकेने खातेधारकांना केवळ लघुसंदेशांच्या (एसएमएस) माध्यमातून ग्राहकांना आवाहन केले जात आहे. ज्या बॅँकेत खाते असेल त्याच बॅँकेत विमा उतरवण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास अनेक बॅँकांकडे विमा काढण्यासाठी खातेदारांनी धाव घेतली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र बॅँकेने ७० हजार विमे उतरवले आहेत.