शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

५ लाख नाशिककर झाले विमेकरी

By admin | Updated: May 28, 2015 00:09 IST

प्रधानमंत्री विमा योजना : कालावधी जून २०१५ ते मे २०१६

नाशिक : देशातील ८० टक्केनागरिक विमा क्षेत्राच्या बाहेर असल्याने कष्टकरी लोकांनाही विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्राने सुरू केलेल्या विमा योजनांना नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ १७ दिवसांतच ही संख्या पाच लाखांवर पोहोचली आहे. अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या त्या तीन प्रकारच्या योजना आहेत. सुरक्षा विमा आणि जीवनज्योती या दोन्ही योजना अनुक्रमे १२ आणि ३३० रुपयांच्या असून, त्यांना चांगला प्रतिसाद आहे. केवळ १२ रुपयांत अपघात विमा आणि ३३० रुपयांत नैसर्गिक मृत्यू आल्यास २ लाख रुपयांचा परतावा त्यातून मिळणार आहे. पेन्शन योजनेत सहभागी झाल्यानंतर आजचा युवक भविष्यात मुलांवर अवलंबून राहणार नाही. याशिवाय विमा योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना आणि त्यांच्या वारसांना या योजनेतून अपघातानंतर मदत दिली जाईल. ९ मे रोजी या योजनांचे उद्घाटन झाले तेव्हाच नाशिक जिल्ह्यात सुमारे एक लाख ६५ हजार लोकांनी यासाठी नोंदणी केली होती. त्यानंतर दररोज या योजनेला प्रतिसाद मिळत असून, सर्व बॅँकांचे मिळून सुमारे ५ लाख नागरिकांनी विम्याचे कवच विकत घेतले आहे. हा विमा उतरवण्यासाठी खासगी बॅँकांनाही परवानगी देण्यात आल्याने बॅँकेने खातेधारकांना केवळ लघुसंदेशांच्या (एसएमएस) माध्यमातून ग्राहकांना आवाहन केले जात आहे. ज्या बॅँकेत खाते असेल त्याच बॅँकेत विमा उतरवण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास अनेक बॅँकांकडे विमा काढण्यासाठी खातेदारांनी धाव घेतली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र बॅँकेने ७० हजार विमे उतरवले आहेत.