शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

व्यापाऱ्यांना ४८ तासांचा ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: July 10, 2016 00:47 IST

बाजार समित्या बंद : आज प्रधानसचिवांकडे तातडीची बैठक

नाशिक : बाजार समित्यांमधील फळभाज्या व शेतमालाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी ६ टक्के कर शेतकऱ्यांकडूनच घेण्याचा व या निर्णयाविरोधात पुकारलेल्या बंदमुळे येत्या ४८ तासात व्यापाऱ्यांनी त्यांची भूमिका न बदलल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सहकार व बाजार समित्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रविवारी (दि.१०) राज्यातील सर्व विभागीय सह निबंधक व जिल्हा उपनिबंधकांची पणनच्या प्रधान सचिवांकडे तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.शनिवारी (दि.९) यासंदर्भात तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस विभागीय सह निबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ कऱ्हे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती देवीदास पिंगळे, दिलीप बनकर, मुकुंद होळकर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, उषाताई शिंदे, संजय सांगळे, काशीनाथ मेंगाळ, अ‍ॅड. संदीप गुळवे यांच्यासह शेतकरी उत्पादक गट (फामर्स प्रोड्युसर कंपनी)चे सदस्य आदि उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल विक्रीबाबत येणाऱ्या अडचणी, व्यापाऱ्यांचे आडमुठे धोरण, मुंबईसह अन्य ठिकाणी शेतमालाची वाहतूक यावर चर्चा झाली. व्यापाऱ्यांनी शासनाच्या बाजार समिती नियमन विरोधात पवित्रा घेतल्याने त्यांनी सोमवारपर्यंत त्यांचा पवित्रा न बदलल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. सुरुवातीला व्यापाऱ्यांना विनंती करा, विनंतीला अव्हेरले, तर परवाने निलंबित करण्याची कारवाई करा आणि तरीही ऐकले नाही तर बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांना दिलेले गाळे खाली करा, अशी तंबी विभागीय सह निबंधक मिलिंद भालेराव यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या बाजार समित्यांच्या सभापतींना दिल्याचे कळते. त्यामुळे सोमवारी व्यापारी सहभागी न झाल्यास त्यांचे परवाने निलंबित होण्याची कारवाई सहकार विभागाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. काही बाजार समित्यांच्या सभापतींनी शेतकऱ्यांचा शेतमाल थेट बाजार समितीने विकत घेऊन तो व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी बाजार समित्यांना खेळते भांडवल पुरविण्याची मागणी केली, तर काही सभापतींनी बाजार समितीच्या आत आणि बाहेर वेगवेगळे कायदे नको, सर्वांना सारखा कायदा हवा,अशी मागणी केली. शेतकऱ्यांना कोणीही वेठीस धरणार नाही, याची काळजी घ्या, असे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सूचित केले. तसेच शेतकऱ्यांसाठी १०७७ हा टोल फ्री नंबरही सुरू करण्यात आल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)