शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

४५०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी

By admin | Updated: September 27, 2016 00:59 IST

४५०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी

नाशिक : महापालिकेला सन २०१६ - १७ या वर्षासाठी येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत गंगापूर आणि दारणा धरण समूहातील पाण्याबाबतची मागणी पाटबंधारे खात्याकडे नोंदवायची असून, यंदा ४५०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मागील वर्षी कमी पाऊसमान आणि जायकवाडी धरणाला पाणी पळविण्याच्या प्रकारामुळे महापालिकेला पाणीकपातीचा कटू निर्णय घ्यावा लागला होता. मागील वर्षासाठी महापालिकेने ४३०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविली होती, परंतु नंतर पाणीप्रश्नी झालेले राजकारण आणि पाणी पळवापळवीच्या प्रकारामुळे जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातील २७००, तर दारणा धरणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित ठेवले होते. नंतर पाणीप्रश्नाची तीव्रता पाहून जलसंपदा विभागाने अतिरिक्त ३०० दलघफू पाणी आरक्षण गंगापूर धरणातून वाढवून दिले होते. सदर पाणी महापालिकेने ३१ जुलैपर्यंत पुरविले. यंदा, गंगापूरसह दारणा धरणात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. त्यातच शहराला प्रतिदिन ४०५ ते ४१० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे यंदा ४५०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविली जाणार आहे. (प्रतिनिधी)