शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के साठा

By admin | Updated: March 5, 2017 02:01 IST

नाशिक : जिल्ह्यात पाण्याची मागणी व धरणामधील उपलब्ध साठा पाहता आगामी चार महिन्यांत पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागताच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, पाण्याची मागणी व धरणामधील उपलब्ध साठा पाहता आगामी चार महिन्यांत पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के साठा असून, त्यात सिंचनाचे आवर्तनासाठी पाणी राखून ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात सात वर्षांनंतर गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणांमध्येही आॅक्टोबर अखेर ९२ टक्के इतका साठा शिल्लक होता. याशिवाय समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले, तसेच गावोगावी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील पाझरतलाव, सीमेंट बंधारे, शेततळ्यांमध्येही कमालीचे पाणी साठले. या साठलेल्या पाण्यातून शेतकऱ्यांनी खरीप व रब्बीचे पिके पिकविली. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी शक्यता व्यक्ती केली जात असताना, प्रत्यक्षात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा तडाखा बसू लागल्याने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटू लागले, विहिरींनीही तळ गाठल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. विशेष करून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्णातील मोठे, मध्यम धरणांमध्ये ४४ टक्के इतकेच पाणी शिल्लक असून, या पाण्यावर आगामी चार महिन्यांची गरज भागवावी लागणार आहे. त्यातही नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ५८ टक्के इतके पाणी शिल्लक आहे. याशिवाय पालखेड धरण समूहात १७ तर गिरणा खोऱ्यात ४४ टक्के साठा आहे. या शिल्लक पाणी साठ्यात जिल्ह्णातील पाणीपुरवठा योजना, नळ पाणी योजना तसेच सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या धरणातून त्यासाठी पाणी सोडण्यात येणार असून, याशिवाय लगतच्या जिल्ह्णांचे असलेले आरक्षण वेगळे आहे.