शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के साठा

By admin | Updated: March 5, 2017 02:22 IST

नाशिक : जिल्ह्यात पाण्याची मागणी व धरणामधील उपलब्ध साठा पाहता आगामी चार महिन्यांत पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

 नाशिक : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागताच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, पाण्याची मागणी व धरणामधील उपलब्ध साठा पाहता आगामी चार महिन्यांत पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के साठा असून, त्यात सिंचनाचे आवर्तनासाठी पाणी राखून ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात सात वर्षांनंतर गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणांमध्येही आॅक्टोबर अखेर ९२ टक्के इतका साठा शिल्लक होता. याशिवाय समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले, तसेच गावोगावी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील पाझरतलाव, सीमेंट बंधारे, शेततळ्यांमध्येही कमालीचे पाणी साठले. या साठलेल्या पाण्यातून शेतकऱ्यांनी खरीप व रब्बीचे पिके पिकविली. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी शक्यता व्यक्ती केली जात असताना, प्रत्यक्षात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा तडाखा बसू लागल्याने पाण्याचे (पान ७ वर)नैसर्गिक स्त्रोत आटू लागले, विहिरींनीही तळ गाठल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. विशेष करून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्णातील मोठे, मध्यम धरणांमध्ये ४४ टक्के इतकेच पाणी शिल्लक असून, या पाण्यावर आगामी चार महिन्यांची गरज भागवावी लागणार आहे. त्यातही नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ५८ टक्के इतके पाणी शिल्लक आहे. याशिवाय पालखेड धरण समूहात १७ तर गिरणा खोऱ्यात ४४ टक्के साठा आहे. या शिल्लक पाणी साठ्यात जिल्ह्णातील पाणीपुरवठा योजना, नळ पाणी योजना तसेच सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या धरणातून त्यासाठी पाणी सोडण्यात येणार असून, याशिवाय लगतच्या जिल्ह्णांचे असलेले आरक्षण वेगळे आहे.