शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

४२१७ लाभार्थ्यांना शौचालयासाठी अनुदान

By admin | Updated: December 17, 2015 00:09 IST

स्वच्छ भारत अभियान : ४५० शौचालयांचे काम सुरू, आणखी निधीची मागणी

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत महापालिकेने शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला असून शहरात उघड्यावर प्रातर्विधीसाठी बसणाऱ्या ६९५० लाभार्थ्यांना वैयक्तिक, तर २२४ ठिकाणी सामूहिक शौचालय बांधून दिले जाणार आहे. महापालिकेने आतापर्यंत ४२१७ लाभार्थ्यांना शौचालयासाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. सद्यस्थितीत ४५० शौचालयांचे बांधकाम सुरू असून त्यातील १५ शौचालयांचे काम पूर्ण झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी दिली. केंद्र व राज्य सरकारमार्फत स्वच्छ भारत (नागरी) अभियानअंतर्गत घरोघरी शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार, महापालिकेने पाच महिन्यांपूर्वी शहरात सर्वेक्षण केले असता, ५१ हजार ५८४ कुटुंबांच्या घरात शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले, तर ४४ हजार ६८० कुटुंबांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्याचे समोर आले होते. ७१७४ कुटुंबे मात्र उघड्यावरच शौचविधी पार पाडत असल्याचे आढळून आले. त्यानुसार, महापालिकेने सदर ७१५४ कुटुंबांकडून शौचालय उभारणीसंबंधी अर्ज भरून घेतले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर त्यातील ८७७ अर्ज तांत्रिक मुद्द्यांवरून बाद ठरविण्यात आले. ६०७३ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधून दिले जाणार असून त्यांना त्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान अदा केले जाणार आहे, तर ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्याकरिता २२४ ठिकाणी सामूहिक शौचालय उभारले जाणार आहेत. महापालिकेने आतापर्यंत ४२१७ लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर प्रत्येकी ६ हजार रुपयांचे अनुदान जमा केले आहे. उर्वरित अनुदान शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अदा केले जाणार आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपलब्ध निधी २ कोटी ५३ लाख रुपयांचे वाटप केले आहे. आणखी निधीसाठी सरकारकडे मागणी करण्यात आल्याचे सोनवणे यांनी सांगितले. सद्यस्थितीत ४५० शौचालयांचे बांधकाम सुरू असून १५ शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे. पूर्ण झालेल्या शौचालयांच्या बांधकामाची अभियंत्यामार्फत तपासणी करून खात्री झाल्यानंतरच उर्वरित अनुदानाचे वाटप होणार आहे. ज्याठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही अशा ठिकाणी प्रामुख्याने झोपडपट्टी भागात शौचालयासाठी सेफ्टी टॅँक बांधून दिली जाणार आहे. सदर बांधकाम लाभार्थ्यांना बॅँक खात्यात अनुदान जमा झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत किंवा जानेवारी अखेर पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)