शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

४१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

By admin | Updated: May 30, 2017 00:11 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ चा सुधारित व २०१७-१८च्या मूळ ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२ च्या अर्थसंकल्पास काही कपातींच्या दुरुस्तींसह मंजुरी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ चा सुधारित व २०१७-१८च्या मूळ ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२ च्या अर्थसंकल्पास सोमवारी (दि.२९) झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत काही कपातींच्या दुरुस्तींसह मंजुरी देण्यात आली.दरम्यान, कपात करण्यात आलेल्या विभागांमध्ये प्रामुख्याने बांधकाम, लघुपाटबंधारे व कृषी विभागातील योजनांचा समावेश आहे. मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी असलेली पाच लाखांची तरतूद वाढवून २० लाख करण्यात आली, तर ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी असलेली चारचाकी वाहन खरेदी योजना याही वर्षी धरण्यात येऊन त्यात एक कोटींनी वाढ करून या योजनेसाठी दोन कोटींचा निधी ठेवण्यात आला. पदाधिकारी व अधिकारी निवासस्थान व कार्यालय दुरुस्तीवरील धरण्यात आलेल्या एकूण तरतुदीत एक ते दीड कोटींनी कपात करण्यात येऊन हा निधी रस्ते व बंधारे दुरुस्तीसाठी तीन लाखांनी वाढविण्यात आला.अध्यक्षस्थानी शीतल उदय सांगळे होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, सभापती अर्पणा खोसकर, मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदी उपस्थित होते.यावेळी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वीज वितरणाचा आढावा घेण्यात आला. कंपनीकडील असलेल्या तक्रारींचा ओघ पाहून स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात मुद्रांक, वाहन व व्यवसाय करापोटी एकूण २७ कोटी ६१ लाख जमा होणार असल्याचे स्पष्ट केले. एकूण जमेच्या बाजू धरून ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२चा अर्थसंकल्प सादर केला. खर्चाच्या बाजू मांडताना डॉ. कुंभार्डे, धनराज महाले, बाळासाहेब क्षीरसागर, यतिन पगार, नितीन पवार, उदय जाधव, भास्कर गावित, हिरामण खोसकर यांनी अधिकारी निवासस्थान तसेच कार्यालय दुरुस्तीसाठीच्या एक कोटी ३० लाखांपैकी ६५ लाखांच्या खर्चात कपात करून निधी सेसकडे वळविला.

जाधव-गावित खडाजंगीच्कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमधून राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव यांनी कपाती सूचविल्यानंतर उपाध्यक्ष नयना गावित व उदय जाधव यांच्यात खडाजंगी झाली. या योजनांसाठी राज्यस्तरावरून निधी येत असल्याने त्यासाठीची तरतूद रद्द करावे, असे जाधव यांचे म्हणणे होते, तर योजनांमध्ये तुम्ही कपात सुचवून शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचे उपाध्यक्ष नयना गावित यांचे म्हणणे होते.