शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मतदारयादीत ४० हजार नवीन मतदार विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST

नाशिक : मतदार यादी पुनर्रीक्षण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या पडताळणी मोहिमेत ४० हजार ९९९ नवमतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत, ...

नाशिक : मतदार यादी पुनर्रीक्षण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या पडताळणी मोहिमेत ४० हजार ९९९ नवमतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत, तर दुबार, मृत आढळून आलेली सुमारे ५४ हजार नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेतून यादी अधिकाधिक शुद्ध झाली असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

मतदार यादी पुनर्रीक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया असून, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात पडताळणी मोहीम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत दि. १ जानेवारी ते ५ ऑगस्ट या कालावधीत ५४ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. मतदार यादीत दोनदा आढळून आलेली नावे, तसेच मतदार मृत झाल्यानंतरही त्यांची नावे यादीत कायम होती अशी सर्व नावे वगळण्यात आली आहेत. एकीकडे सुमारे ५३ हजार नावे वगळण्यात आली असली तरी मतदार यादीत ४० हजार ९९९ नवमतदारांची भरदेखील पडली आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारीपासून निवडणूक शाखेकडून यादी शुद्धिकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानुसार राबविण्यात आलेल्या मोहिमेत दुबार नावे वगळण्याबरोबरच नवमतदारांच्या नोंदणीला प्राधान्य देण्यात आले होते. मतदार यादीतील मतदारांची दुबार नावे रद्द करणे याबरोबरच मतदारांचे नाव, पत्ता यात काही दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करणे, या मोहिमेत अनेकांच्या मागणीनुसार मतदारसंघ बदल करण्यात आले. बीएलओंनी मतदारांच्या घरोघरी भेट देत तपासणी व पडताळणी करून मोहीम राबविण्यात आली. मतदार यादीत शंभर टक्के मतदारांच्या छायाचित्रांचा समावेशदेखील करण्यात आला आहे.

मतदार यादीतून दुबार व मृत नावे वगळावी यासाठी फाॅर्म ७ भरण्यात आला होता, तर घरभेटीत मतदार संबंधित पत्त्यावर आढळून न आल्याने त्यांचीही नावे वगळण्यात आली. त्यानुसार निवडणूक शाखेने पडताळणी करीत मतदार यादीतून ५४ हजार नावे वगळली आहेत. तसेच १ जानेवारी ते ५ ऑगस्ट या कालावधीत ४० हजार ९९९ नवमतदारांची नोंदणी झाली. यासाठी मतदारांना आवाहन करण्यात आले होेते. मतदारसंघनिहाय मतदारांना यादीतील बदलाबाबतची संधी देण्यात आली होती. ज्यांना छायाचित्र जमा करावयाचे आहे किंवा नावात, पत्त्यात बदल करावयाचा असेल त्यांना रीतसर अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.

--इन्फाो--

नवीन मतदार केंद्राची आवश्यकता नाही

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १५०० मतदारांमागे एक मतदान केंद्र उभारले जाते. त्यानुसार मतदार यादी पडताळणीनुसार आता जिल्ह्यात नवीन मतदार केंद्र उघडण्याची आवश्यकता राहिलेली नाही. मतदार नोंदणीमुळे यादीत जवळपास ४१ हजार मतदारांची भर पडली. मात्र, ५४ हजार नावे वगळण्यात आली. त्यामुळे नवीन मतदान केंद्र उभारण्याची आवश्यकता नसल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.