शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘समृद्धी’साठी चारशे शेतकºयांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:14 IST

४० कोटींचे वाटप : ४० हेक्टर जमीन ताब्यात नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या घोषणेपासूनच विरोधी भूमिका घेणाºया जिल्ह्यतील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मन वळविण्यास प्रशासनाला यश आल्याने जवळपास चारशे शेतकºयांनी आपल्या मालकीची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या महिनाभरात सुमारे ५० शेतकºयांकडून ४० हेक्टर जागेची थेट खरेदी करण्यात आली असून, त्यापोटी ४० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.

४० कोटींचे वाटप : ४० हेक्टर जमीन ताब्यातनाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या घोषणेपासूनच विरोधी भूमिका घेणाºया जिल्ह्यतील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मन वळविण्यास प्रशासनाला यश आल्याने जवळपास चारशे शेतकºयांनी आपल्या मालकीची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या महिनाभरात सुमारे ५० शेतकºयांकडून ४० हेक्टर जागेची थेट खरेदी करण्यात आली असून, त्यापोटी ४० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतील ४६ गावांमधून समृद्धी महामार्ग जाणार असून, या मार्गासाठी लागणाºया जमिनींची संयुक्त मोजणी प्रशासनाने पूर्ण केली आहे. तथापि, या मार्गाची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक गावागावातून त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यात आला होता. मोर्चे, आंदोलने, घेराव यांसारख्या आंदोलनांनी शेतकºयांमध्ये जागृती करण्यात आली. सिन्नर तालुक्यातील शिवडेसह ज्या सहा गावांनी मोजणीस विरोध करून आंदोलनाचे अस्त्र उपसून मोजणी करण्यात आलेल्या अधिकाºयांना पिटाळून लावल्यामुळे तर महामार्गाच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जात होती.या जागांचे मूल्यमापनही पूर्ण करण्यात आल्यामुळे आता फक्त शेतकºयांच्या सहमतीवरच सारी भिस्त आहे. त्यातील सुमारे ५० ते ५५ शेतकºयांकडून ४० हेक्टर क्षेत्राची खरेदी घेण्यात आली असून, सिन्नर तालुक्यातील तीनशे व इगतपुरीतील शंभर अशा चारशे शेतकºयांनी आजच समृद्धीसाठी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात या जमिनींची खरेदी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिस्से, पोटहिश्शांची अडचणसमृद्धीसाठी जागा खरेदीत प्रामुख्याने शेतकºयांचे हिस्से, पोटहिश्शांची मोठी अडचण आहे. एकाच क्षेत्रावर तीन ते चार जागा मालकांचे हिस्से आहेत. अशावेळी सर्वांची एकत्रित संमती मिळण्यात तसेच प्रत्येकाच्या क्षेत्राचे वर्गीकरण करून त्याचे मूल्यांकन करणे अवघड व वेळखाऊपणाचे असल्याने थेट खरेदीत अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.