शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जूनच्या मध्यावर नाशिकमधील धरणांमध्ये ४० टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:37 IST

नाशिक : मागील वर्षापासून वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने तृप्त झालेल्या धरणांमध्ये यंदादेखील समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा असून, काही धरणांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे.

नाशिक : मागील वर्षापासून वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने तृप्त झालेल्या धरणांमध्ये यंदादेखील समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा असून, काही धरणांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे.यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनचा प्रभाव नाशिक जिल्ह्यातही पहायला मिळाला. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहे, तर तत्पूर्वी निसर्गचक्रीवादळामुळेदेखील अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. खरिपाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा मान्सून अनुकूल असल्याने पुढील आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना करावा लागल्याने जिल्ह्याची परिस्थिती बिकट होती. जिल्ह्यातील सहा तालुके शासनाने दुष्काळी म्हणून जाहीरही केले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने साहजिकच धरणांमधील साठाही मर्यादित होता. यावरून राजकीय वातावरणही तापले होते.मागीलवर्षी मात्र वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने नाशिकमधील धरणे १०० टक्के भरलीच शिवाय मराठवाडाचादेखील पाणीप्रश्न सुटला.मागीलवर्षीच्या पाणी साठ्यामुळे यंदा जूनच्या मध्यावरच धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असून, पाच धरणे ४० टक्क्यांच्या पुढे तर उर्वरित धरणांमध्ये ३० ते ३५ टक्के इतका पाणीसाठा आहे.-------------------मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर धरणांची पातळी लवकर वाढण्याची शक्यता आहे. सध्या गंगापूर, ओझरखेड, दारणा, नांदुरमधमेश्वर, हरणबारी आणि पूनद या प्रकल्पांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत धरणांमधील पाणीसाठा आणि एकूणच अनुकूल पावसाचा परिणाम लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संभाव्य पूरपरिस्थितींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने नियोजनदेखील केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक