शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

जूनच्या मध्यावर नाशिकमधील धरणांमध्ये ४० टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:37 IST

नाशिक : मागील वर्षापासून वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने तृप्त झालेल्या धरणांमध्ये यंदादेखील समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा असून, काही धरणांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे.

नाशिक : मागील वर्षापासून वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने तृप्त झालेल्या धरणांमध्ये यंदादेखील समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा असून, काही धरणांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे.यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनचा प्रभाव नाशिक जिल्ह्यातही पहायला मिळाला. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहे, तर तत्पूर्वी निसर्गचक्रीवादळामुळेदेखील अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. खरिपाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा मान्सून अनुकूल असल्याने पुढील आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना करावा लागल्याने जिल्ह्याची परिस्थिती बिकट होती. जिल्ह्यातील सहा तालुके शासनाने दुष्काळी म्हणून जाहीरही केले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने साहजिकच धरणांमधील साठाही मर्यादित होता. यावरून राजकीय वातावरणही तापले होते.मागीलवर्षी मात्र वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने नाशिकमधील धरणे १०० टक्के भरलीच शिवाय मराठवाडाचादेखील पाणीप्रश्न सुटला.मागीलवर्षीच्या पाणी साठ्यामुळे यंदा जूनच्या मध्यावरच धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असून, पाच धरणे ४० टक्क्यांच्या पुढे तर उर्वरित धरणांमध्ये ३० ते ३५ टक्के इतका पाणीसाठा आहे.-------------------मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर धरणांची पातळी लवकर वाढण्याची शक्यता आहे. सध्या गंगापूर, ओझरखेड, दारणा, नांदुरमधमेश्वर, हरणबारी आणि पूनद या प्रकल्पांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत धरणांमधील पाणीसाठा आणि एकूणच अनुकूल पावसाचा परिणाम लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संभाव्य पूरपरिस्थितींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने नियोजनदेखील केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक