शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तिसरी यादी जाहिर तरी रवायकेचा कटऑप 400 च्या पुढे

By संजय दुनबळे | Updated: July 13, 2023 19:00 IST

११ वी प्रवेश : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत मुदत

नाशिक : शहरातील ६६ महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या उपलब्ध असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी तिसरी गुणवत्तायादी बुधवारी (दि.१२) प्रसिद्ध झाली असून, या यादीत ३७८१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून त्यांना आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी शुक्रवारपर्यंत (दि. १४) मुदत देण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत आर.वाय.के. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा जनरलचा कटऑप ४०९ गुणांपर्यंत आला आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये असलेल्या जागांवरील प्रवेशासठी केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात येत असून, आतापर्यंत दोन गुणवत्तायाद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दोन्ही यादींत नावे आली नाहीत त्यांना तिसऱ्या यादीची प्रतीक्षा होती.

आतापर्यंत ११,१६८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये अद्यापही दहा हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या गुणवत्तायादीनुसार तीनही विद्याशाखांसाठी एकूण ३७८१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपले प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शाखानिहाय संधी मिळालेले विद्यार्थीकला - ५५७

वाणिज्य -१०२३विज्ञान - २११६

एचएसव्हीसी - ८५

पसंतिक्रमानुसार विद्यार्थी संख्या

१ - १८४७२ - ७६६

३ - ४७६४ - २८९

५ - १७३

महाविद्यालयनिहाय विज्ञानचा कटऑफ

आर.वाय.के. महाविद्यालय - ४०९

सर एम.एस. गोसावी कॉलेज - ३९२बॉइज टाऊन कनिष्ठ महाविद्यालय - ४०५

केे.टी.एच.एम. कॉलेज - ३८३केव्हीएन नाईक महाविद्यालय - ३८६

लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय - ३५७नाशिकरोड महाविद्यालय - ३३७

सिडको कॉलेज - ३७५

वाणिज्य शाखेलाही पसंती

विज्ञान शाखेबरोबरच वाणिज्य शाखेलाही विद्यार्थ्यांची चांगली पसंती मिळत असून लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात तर विज्ञानपेक्षा वाणिज्य शाखेचा कटऑफ जास्त आहे. येथे वाणिज्य शाखेला ४२२ गुणांचा कटऑफ लागला आहे. तर सर एम.एस. गोसावी महाविद्यालयात ३६१ गुणांचा कटऑफ लागला आहे. वाणिज्य शाखेच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधींमुळे या विद्याशाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसते.