शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

तिसरी यादी जाहिर तरी रवायकेचा कटऑप 400 च्या पुढे

By संजय दुनबळे | Updated: July 13, 2023 19:00 IST

११ वी प्रवेश : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत मुदत

नाशिक : शहरातील ६६ महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या उपलब्ध असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी तिसरी गुणवत्तायादी बुधवारी (दि.१२) प्रसिद्ध झाली असून, या यादीत ३७८१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून त्यांना आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी शुक्रवारपर्यंत (दि. १४) मुदत देण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत आर.वाय.के. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा जनरलचा कटऑप ४०९ गुणांपर्यंत आला आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये असलेल्या जागांवरील प्रवेशासठी केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात येत असून, आतापर्यंत दोन गुणवत्तायाद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दोन्ही यादींत नावे आली नाहीत त्यांना तिसऱ्या यादीची प्रतीक्षा होती.

आतापर्यंत ११,१६८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये अद्यापही दहा हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या गुणवत्तायादीनुसार तीनही विद्याशाखांसाठी एकूण ३७८१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपले प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शाखानिहाय संधी मिळालेले विद्यार्थीकला - ५५७

वाणिज्य -१०२३विज्ञान - २११६

एचएसव्हीसी - ८५

पसंतिक्रमानुसार विद्यार्थी संख्या

१ - १८४७२ - ७६६

३ - ४७६४ - २८९

५ - १७३

महाविद्यालयनिहाय विज्ञानचा कटऑफ

आर.वाय.के. महाविद्यालय - ४०९

सर एम.एस. गोसावी कॉलेज - ३९२बॉइज टाऊन कनिष्ठ महाविद्यालय - ४०५

केे.टी.एच.एम. कॉलेज - ३८३केव्हीएन नाईक महाविद्यालय - ३८६

लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय - ३५७नाशिकरोड महाविद्यालय - ३३७

सिडको कॉलेज - ३७५

वाणिज्य शाखेलाही पसंती

विज्ञान शाखेबरोबरच वाणिज्य शाखेलाही विद्यार्थ्यांची चांगली पसंती मिळत असून लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात तर विज्ञानपेक्षा वाणिज्य शाखेचा कटऑफ जास्त आहे. येथे वाणिज्य शाखेला ४२२ गुणांचा कटऑफ लागला आहे. तर सर एम.एस. गोसावी महाविद्यालयात ३६१ गुणांचा कटऑफ लागला आहे. वाणिज्य शाखेच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधींमुळे या विद्याशाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसते.