शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

३८गाव योजनेचे पाणी ‘पेटण्याची’ चिन्हे

By admin | Updated: August 2, 2016 01:21 IST

बैठक स्थगितीची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

 येवला : काही गावांतून एकापेक्षा अधिक नावाचे ठराव आल्याने, शिवाय पाणी योजनेचे पदसिद्ध सदस्य सरपंच ठरत असल्याने जिल्हा परिषद कार्यालयाच्या सभासद यादी मंजुरीनंतरच ३८गाव पाणीपुरवठा योजनेच्या सदस्यांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी केली आहे. ३८ गाव पाणी योजना सदस्य यादीबाबत हरकत घेताना राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरसूल, धानोरे, धूळगाव, एरंडगाव खु., देवठाण, बाभूळगाव, अंगणगाव, अनकुटे, विसापूर, कातरणी, रेंडाळे या गावांतून एकापेक्षा जास्त नावाचे ठराव आलेले असल्याने विषय वादग्रस्त आहे. अंगणगाव व धामोडे या गावात ग्रामसभा झालेल्या नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल केल्या आहेत. १२ आॅगस्ट २००९च्या ग्रामीण पाणीपुरवठा शासननिर्णयाप्रमाणे गावाचे ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच असतात. सरपंचांनी कामास नकार दिल्यास इतर व्यक्तीची निवड होऊ शकते. मात्र अनकुटे, धूळगाव, कातरणी या गावांतील सरपंचांचे पत्र प्राप्त असतानादेखील अन्य व्यक्तीच्या नावाचे ठराव आलेले आहेत. यामुळे ३८ गावाच्या ठरावाद्वारे नावे निश्चित करावे, नावाची जिल्हा परिषद कार्यालयाकडून मंजुरी घ्यावी व मंजुरी मिळाल्यानंतर बैठक घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अनधिकृत ग्रामसभा व मासिक ठरावांची चौकशी करण्याची मागणी येथील राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.तालुक्यात ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरळीत सुरू आहे. पंचायत समिती कार्यालयाकडून ३८ गावातील समिती सदस्यांचे ग्रामपंचायतीकडून ठराव मागविण्यात आले होते. ठराव झाल्यानंतर या समितीची मुदत ५ वर्षांची असते, असे असताना तालुक्यातील नगरसूल, धानोरे, एरंडगाव खु., देवठाण, बाभूळगाव, अंगणगाव, अनकुटे, विसापूर, कातरणी, रेंडाळे या गावांतील ग्रामसेवकांनी परस्पर मर्जीतल्या लोकांच्या नावे ठराव लिहून दिला असल्याने या ग्रामसेवकांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मोहन शेलार, संजय बनकर, मकरंद सोनवणे, वसंत पवार, भाऊसाहेब कळसकर, जावेद खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)